राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
छगन भुजबळ यांनी अजित पवारांवर थेट शाब्दिक हल्ले चढवणे सुरू केले आहे. लोकांमध्ये लगेच गेलात तर माध्यमांना प्रतिक्रिया द्यावी लागेल, त्यापेक्षा 'नॉट रिचेबल' राहणे योग्य, असा सल्ला अजित पवार यांना देण्यात आला असल्याचे समजते. ...
Maharashtra Assembly Winter Session: एकीकडे छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मागच्या २४ तासांपासून अजित पवार हे नॉट रिचेबल असल्याचा ...
विरोधकांनी हिवाळी अधिवेशनात लक्ष्य केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपली बाजू मांडली आहे आणि वाल्मिक कराड यांच्याशी असलेल्या संबंधांवरही भाष्य केलं आहे. ...