राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलाविली होती. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आले असून काल त्यांनी जळगावात सभा घेतली. या सभेत त्यांनी खासदार शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. ...
भाजपसह सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून महाराष्ट्रात महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू आहे, काही जागांवर दोन्ही पक्षांकडून दावा केला असल्याचे बोलले जात आहे. ...