राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Sunetra Ajit Pawar Baramati News: सुनेत्रा पवारांचा पराभव झाला तर अजित पवारांचे राजकीय अस्तित्व संपेल, अशी चर्चा सुरु आहे. २०१९ मध्ये पार्थ पवार यांचा पराभव झाला होता. परंतु त्याने अजित पवारांना काही फरक पडला नव्हता. कारण तेव्हाची परिस्थिती वेगळ होती ...
भुजबळ यांच्या नावावरूनच बरा-वाईट खल सुरू झाल्याने त्यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत उमेदवारीच्या स्पर्धेतून बाहेर पडत असल्याचे घोषित केले. ...
NCP DCM Ajit Pawar News: नवनीत राणांच्या प्रचारासाठी गेलेल्या अजित पवारांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने घेतलेल्या एका भूमिकेवरून शरद पवारांवर टीका केली. ...