महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
आज राजकारणाचे प्रचंड अध:पतन झालेले आहे. या राजकारण्यांना केवळ साहित्यिक लोकच सुधारू शकतात. साहित्यिकांनी राजकारण्यांना योग्य दिशा देण्याचे काम करावे, असे खडेबोल राज ठाकरे यांनी साहित्यिकांना सुनावले. ...
ज्याप्रकारची भाषा राजकारणात वापरली जातेय. त्यांना कान धरून पुन्हा जमिनीवर आणणं हे शिकवणं, सांगणं, समजावून सांगणे हे तुमचं कर्तव्य आहे असं मी मानतो. त्या अधिकार वाणीने तुम्ही बोलू शकता, सांगू शकता असं राज ठाकरेंनी सांगितले. ...
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. जोरदार जल्लोष करायला हवा होता. मात्र, तसे दिसले नाही. आपण लेटलतीफ ठरलो, अशा भाषेत नाराजी व्यक्त करीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची शाळा घेतली. ...
लोकसभेत महायुतीत असताना मनसेने चांगले काम केले आहे, हे मी सर्वांसमक्ष सांगितले आहे. पण भविष्यामध्ये काही दिवसांत काय होते, याची आपल्याला वाट पाहावी लागेल, याकडे श्रीकांत शिंदे यांनी लक्ष वेधले. ...