Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
महाविकास आघाडी सरकारच्या काळात महामंडळे, उपक्रम, मंडळे, समित्या यांच्यावरील अशासकीय म्हणजे राजकीय नियुक्त्या नवीन सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
शिवसेनेच्या आजच्या परिस्थितीला शरद पवार आणि अजित पवार हे नेते जबाबदार असल्याची टीका करत याबाबत उद्धव ठाकरेंनी यांनी आत्मपरीक्षण करावे, असे मत रामदास कदम यांनी व्यक्त केले. ...