जिल्ह्यातील प्रत्येक गावात शाश्वत पाण्याची उपलब्धता आणि शेतीकरीता शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे सुरु आहेत. ...
मागील अनेक वर्षांपासून हिंगोली टपाल कार्यालयाचे कामकाज निवासस्थानातच सुरू होते. अखेर १७ मे रोजी टपाल कार्यालयाच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडला. सध्या आदर्श आचारसंहिता लागू असल्याने मात्र उदघाटन सोहळ्यात राजकीय मंडळी दिसून आली नाही. ...
: परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत नुसत्या वायफळ चर्चांनीच जि.प. व न.प. कार्यालयात मंडळी मनोरंजन करून घेत असल्याचे चित्र आहे. ...
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम २00६ व २00८ अन्वये त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी करून अखिल भारतीय किसान सभेच्या जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील १६१.८४ कोटींची कर्जमाफी झाली तरीही १६ हजार २१७ अर्ज अजूनही प्रलंबितच आहेत. आतापर्यंत ३५ हजार १८२ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११३.२८ कोटी वर्ग झाल्याचे सांगितले जात असले तरीही प्रत्यक्ष लाभार्थ्यांना बँकांकडून त ...
हिंगोली येथे २००६ मध्ये जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच स्थापन झाले. मंच स्थापनेपासून आतापर्यंत (२०१८ अखेर) ६९५ पैकी ६५० प्रकरणे निकाली लागले आहेत. तर ४५ प्रकरणे प्रलंबित आहेत. ...
जिल्ह्यासह परजिल्ह्यातही प्रसिद्ध हिंगोलीची बाजारपेठ हळदीसाठी प्रसिद्ध आहे. यंदा हळदीची आवक वाढण्यास प्रारंभ झाला असून बुधवारी शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जवळपास ३६५ वाहनांतून ७ ते ८ हजार क्विंटल हळद विक्रीस आल्याची शक्यता आहे. शुक्रवारपर् ...
खरीप हंगामाला प्रारंभ होण्यासाठी आता २0 दिवसांचा काळ उरला आहे. तरीही बँका पीककर्जाचे शेतकऱ्यांचे अर्जच स्वीकारत नसून अग्रणी बँकही नुसतीच बुजगावण्याची भूमिका निभावत असल्याने शेतकरी कर्जमाफी झाल्याने तरी कर्ज मिळेल, या भ्रमातच आहे. उद्दिष्टाच्या एक टक् ...