केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
Farmers Protest: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाची ठिणगी पेटू शकते. शेतकरी आंदोलकांनी दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा केल्यानंतर पोलीस आणि प्रशासनाने त्यांना रोखण्यासाठी तयारी सुरू केली आहे. ...