देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढणार असून तीन पक्ष एकत्रित बसून जागावाटपाची चर्चा करणार आहेत. आम्ही मिळून या विधानसभा निवडणुकीत राज्यातील महाभ्रष्ट महायुती सरकार सत्तेतून उखडून फेकू, असा निर्धार आजच्या ...
Uttar Pradesh Assembly by Election 2024: उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या १० जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये समाजवादी पक्षासोबत आघाडी करून लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहेत. त्यामुळे या निवडणुकीत इंडिया आघाडीची ताकद दिसण्याची शक्यता आहे. ...
ठाकरे शिवसेनेला मुंबई, कोकण; राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्र आणि काँग्रेसला विदर्भ, मराठवाडा या भागात आपले वर्चस्व ठेवायचे आहे. अशातच या भागातील जागांवर देखील तिन्ही पक्षांचा डोळा असणार आहे. ...