देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Congress Harshwardhan Sapkal News: चंद्रपूर महापौर निवडीबाबत उद्धवसेनेने जी भूमिका घेतली त्याचे परिणाम राज्यात उमटल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला. ...
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा मुद्दा काढला आणि त्यानंतर लोकसभेत गदारोळ सुरु झाला. त्याचा परिणाम म्हणजे पंतप्रधान मोदींना अभिभाषणावरील उत्तरही देता आले नाही. ...
No-Confidence Motion Against The Lok Sabha Speaker: विरोधी पक्षांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावावर काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष या प्रमुख पक्षांसह १२० खासदारांनी सह्या केल्या आहेत. मात्र या ...
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नरवणे यांच्या पुस्तकाबद्दल आणखी एक महत्त्वाचे सत्य उघड केले आहे. त्यांनी पेंग्विन प्रकाशन संस्थेवर खोटे बोलण्याचा आरोप केला. नरवणे स्वतःच्या पुस्तकाला खोटे कसे म्हणू शकतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ...