देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
कॉँग्रेस नेत्या प्रियंका गांधी ह्या उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे झालेल्या हत्याकांडातील पिडीत कुटुंबियांच्या भेटीसाठी जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियंका गांधी यांना नारायणपूर येथे अटक केली. या बेकायदेशीर अटकेच्या निषेधार्थ ...
धनगर आरक्षणासंदर्भात भाजप निर्णय घेईल या भितीने येथील आदीवासी समाजाने भाजप-सेना युतीला डावलले. हाच फॅक्टर विधानसभा निवडणुकीत देखील दिसणार आहे. किंबहुना वैभव पिचड यांच्यासाठी हीच जमेची बाजू ठरण्याची शक्यता आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. येथील एकूण राजकीय व सामाजिक चित्र लक्षात घेता भाजपासाठी हा मतदारसंघ ‘सेफ’ मानण्यात येतो. ...