देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे शनिवारी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या जाण्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाची मोठी हानी झाली आहे. ...
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्यानंतर अजून तरी नवा अध्यक्ष काँग्रेसला मिळालेला नाही. अशा परिस्थितीत पुण्यातल्या एका उच्चशिक्षीत तरुणाने गांधी यांची जागा घेण्याची तयारी दाखवली आहे. ...