देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : भाजपकडून सुरुवातीला शिवसेनेला 105 जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र शिवसेनेने तो प्रस्ताव फेटाळल्यानंतर भाजपकडून 126 जागांचा प्रस्ताव नव्याने मांडण्यात आला असून तो शिवसेनेने मान्य केल्याचे सांगण्यात येत आहे. ...
विदर्भवादाची भूमिका घेतल्यास काँग्रेस पुन्हा बळकट होईल, असे प्रतिपादन राज्याचे माजी महाधिवक्ता व विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रीहरी अणे यांनी केले ...