देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
राजकारणात काही तरी काम करून विधानसभेची उमेदवारी मिळवावी, असा पायंडा पाडताना रोहित आणि धीरज यांनी मिनी मंत्रालयातून थेट विधानसभेच्या रणांगणात कूच केली आहे. ...
माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे नातू आणि विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर भाजपचे विद्ममान आमदार अमल महाडिक यांच्याविरोधात निवडणूक लढवित आहेत. अवघ्या २९ वर्षांच ...
काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील उमेदवारी अर्ज गुरुवारी सायकल रॅली काढून साधेपणाने भरला. या रॅलीद्वारे त्यांनी पर्यावरणपूरक आणि सदृढ कोल्हापूर करण्याबाबतची साद दिली. त्यामध्ये युवक, काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले. ...
राष्ट्रवादीने दुसऱ्या फळीतील नेते बाहेर काढून आणि सत्ताधारी पक्षातील नाराजांना घेऊन उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, हेच नेते निवडून आल्यानंतर पक्षासोबत राहतील का, याची खात्री मिळणे अशक्य आहे. ...
माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी अखेर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, महासचिव के. वेणूगोपाल, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, कोकण प्रभारी बी. ...