श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
एकीकडे कुंभमेळ्याची तयारी सुरू आहे. नियोजनासंदर्भात बैठका होताहेत. पण, नाशिकचा पालकमंत्री अजूनही ठरेना. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचं वर्चस्व असलेल्या नाशिकचा पालकमंत्री कोण होणार, यावर वेगवेगळी कुजबूज सुरू असतानाच भुजबळांनी दावा केला. ...