हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं. Read More
नागपूर—मुंबई समृद्धी महामार्गाचे ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असे नामकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. ...
मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख आणि बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे विराजमान झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेची समृद्धी महामार्गाच्या नामकरणाची मागणी मान्य होणे आता अवघड नव्हते. त्यामुळे हा निर्णय सहजतेने झाल्याचे समजते. ...