अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले. Read More
साधारणत: एखादी व्यक्ती राजकारणात उच्च पदावर पोहोचली की कुटुंबीयांपासून काही प्रमाणात दुरावत जाते. मात्र सर्वच बाबतीत वेगळेपण जपलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कुटुंबीयांना कधीच अंतर दिले नाही. ते स्वत: जरी अविवाहित असले तरी भावाबहिणींच्या ...
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरूवारी (दि.१६) वयाच्या ९३ व्या वर्षी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश शोक सागरात बुडाला. जिल्ह्यातही शोककळा पसरली होती. जनसंघाचे कार्यक्षेत्र गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे ...
भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना विज्ञानाची आवडच नव्हे तर आदर होता अशा शब्दात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांनी त्यांना आदरांजली वाहिली. ...
Atal Bihari Vajpayee Death: लढाऊ विमानासाठी इंजिन तयार करणे हे एक कठिण काम असते. जगातील केवळ निवडक विकसित देश हे काम करीत असताना भारताला या श्रेणीत नेण्याचे महत्त्वाचे कार्य अटलबिहारी वाजपेयींनी केले. ...