अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले. Read More
Atal Bihari Vajpayee: सन 1996 साली वाजपेयींचे 13 दिवसांचे सरकार पडले. त्यावेळी मी काँग्रेसचा संसदीय नेता होतो. त्यामुळे मी संसदेत अविश्वास ठरावाच्याबाजूने आणि सरकारविरोधात भाषण केले. त्यावेळी, वाजपेयींनी ...
अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने भारतातील अटलपर्वाचाच अस्त झाला आहे, असा सर्वमान्य नेता पुन्हा होणे नाही, अशी भावना देशभरात व्यक्त होत आहे. याच भावना अनेक मान्यवरांनी आपल्या लेखातून व्यक्त केल्या आहेत. त्या लेखांचा घेतलेला मागोवा... ...
देशात रामजन्मभूमीचे आंदोलन सुरू होते. त्यावेळी अटलजी लखनौ येथून खासदार होते. वाजपेयी लखनौला आल्यानंतर नेहमीच मीराबाई रोड येथील विश्राम निवासात राहात होते. एकदा ...
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त गुरुवारी संध्याकाळी आले आणि देशभर शोककळाच पसरली. जी बातमी ऐकायची इच्छा नव्हती, ती अखेर ऐकावीच लागली. ...
१९५७ मध्ये त्यांनी परराष्ट्र खात्याच्या कारभारावर टीका करणारे जे भाषण संसदेत केले ते ऐकून तेव्हाचे परराष्ट्रमंत्री व पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी ‘हा तरुण एक दिवस या देशाचा पंतप्रधान होईल’ असे भाकीत केले होते. ...