अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले. Read More
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त येथील म.फुले विद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत ४ हजार ५६१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ...
वाजपेयी व मोदी यांच्या कार्यशैलीत मूलतः फरक आहे. तो समजून न घेता दोघांची तुलना करणे चुकीचे ठरेल. वाजपेयी भाजप (त्याआधी जनसंघ) नेते असले तरी एनडीएचे नेते म्हणूनही त्यांना मान्यता होती. ...
माणसाचे मोल त्याच्या प्रस्थानानंतर होते. त्याचा चांगुलपणा तेव्हाच उठून दिसतो असे सर्वसामान्य माणसाबद्दल बोलले जाते; पण अर्धशतकात राजकीय अवकाशात तळपत राहूनही चांगुलपणा आणि केवळ चांगुलपणा टिकवणारे नाव अटलबिहारी वाजपेयी. ...