अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले. Read More
आपले म्हणणे स्पष्ट शब्दांमध्ये पण कोणालाही न दुखावता मांडण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते. आवेशपूर्ण शैलीमध्ये ते भाषण करत असले तरीही त्यांचे भाषण योग्य मुद्द्यांवरच होत असे. ...
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांची प्रकृती स्थिर व्हावी यासाठी एम्स रुग्णालयातील डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत, असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी दिली. ...
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर एम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी अनेक जण प्रार्थना करत आहेत. ...
भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार होता. दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघाने वाजपेयी यांची भेट घेतली होती. त्यावेळी वाजपेयी यांनी भारताचा कर्णधार सौरव गांगुलीला एक बॅट भेट म्हणून दिली होती. या बॅटवर वाजपेयी यांनी एक भाविनिक संदेश लिहिला ...