अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले. Read More
Atal Bihari Vajpayee: कार खड्ड्यातून आदळत गेली. तेव्हा गाडी सावकाश चालव, असे अटलजी मला थेट म्हणाले नाहीत; पण त्यांनी आशा भोसले यांनी गायलेल्या गाण्यातून ते सुचविले. अटलजी गाणे गातच म्हणाले, ‘ये रास्ते हैं प्यार के, चलना संभल संभल के’. ...
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा औरंगाबादशी वेगळा स्नेह होता. जनसंघापासून ते देशाच्या विदेशमंत्री पदापर्यंतच्या प्रवासात वाजपेयी अनेक वेळा या ऐतिहासिक शहरात येऊन गेले. ...
भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या मृत्यूनंतर देशभर दुखवटा पाळला जात आहे. विविध ठिकाणी नागरिकांकडून श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन सुरू आहे. डहाणूतील दिलीप पटेल या सत्तावीस वर्षीय आर्टिस्टने ...
Atal Bihari Vajpayee : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झालं. एका दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून वायपेयी चांगलेच परिचीत होते. ...
अकोला : अकोल्याच्या मातीने अनेक व्यक्तिमत्त्वांना आकार दिला. स्व. नारायणराव तर्टे हेदेखील याच मातीतील. अकोल्याच्या संघ प्रचारकाने ग्वाल्हेरमध्ये संघाचे काम करून तरुण वयातील अटलबिहारी वाजपेयी यांना संघात आणले. ...