अंधेरी रेल्वेमार्गावरील गोखले पुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील ब्रिटिशकालीन व जुन्या पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रँट रोड येथील पुलालाही तडे गेल्याने, याचे तीव्र पडसाद स्थायी समितीत बुधवारी उमटले. ...
मुंबईतील नागरी सुविधांशी संबंधित अपघातांना महापालिका प्रशासनच जबाबदार आहे. पालिका आपली जबाबदारी झटकू शकत नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला बुधवारी खडसावले. ...
अंधेरी पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील रेल्वे रुळांवरील पुलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. पश्चिम रेल्वेच्या सर्व पुलांची पाहणी करण्याची शिफारस रेल्वे सुरक्षा आयोगाने दोन वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाला केली होती. ...
अंधेरी येथील गोखले पुलाच्या दुर्घटनेच्या जबाबदारीवरून मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामध्ये टोलवाटोलवी आहे. यादरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेस खडेबोल सुनावले. ...
गोखले पूल दुरुस्तीसाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे. ...
रेल्वेला श्रीमंती चोचले पुरवणाऱ्या प्रकल्पांपेक्षा सुरक्षित, सुसह्य प्रवासाची गरज आहे, या मेट्रो मॅन ई. श्रीधरन यांच्या सल्ल्याचे महत्त्व किती आहे, हे दुस-याच दिवशी अंधेरीत रेल्वेमार्गावर पादचारी पूल कोसळल्याच्या दुर्घटनेने दाखवून दिले. ...
अंधेरीतील दुर्घटनाग्रस्त पादचारी पुलाची जबाबदारी महापालिकेने नाकारली असून हा पूल रेल्वेच्या हद्दीत असून त्याच्या दुरुस्तीस रेल्वे प्रशासनाने मागितल्याप्रमाणे २०१०-२०११ मध्येच २३ लाख रुपये देण्यात आले होते. ...