Akhil bharatiya marathi sahitya mahamandal, Latest Marathi News
१९६१ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई, मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद आणि विदर्भ साहित्य संघ नागपूर ह्या त्या त्या प्रदेशात काम करणाऱ्या प्रातिनिधिक चार संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी मराठी भाषेचे, मराठी वाङमयाचे व मराठी संस्कृतीचे काही समान प्रश्न सोडवण्यासाठी एक शिखर संस्था निर्माण करावी असे ठरवले. ती संस्था म्हणजेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ होय. दरम्यान मराठी साहित्य परिषद आंध्रप्रदेश ही हैद्राबादची संस्था १९६४ मध्ये पहिल्यांदा साहित्य महामंडळात समाविष्ट झाली. त्या नंतर नजीकच्या काळात कर्नाटक राज्य साहित्य परिषद आणि मध्यप्रदेश साहित्य संघ या दोन संस्थाही समाविष्ट झाल्या आहेत. Read More
अध्यक्षपदाचा अंतिम निर्णय २४ जानेवारीलाच जाहीर केला जाणार आहे. त्याआधी १९ जानेवारीपर्यंत साहित्य महामंडळाच्या सर्व विभागीय कार्यालयांमधून अग्रणी साहित्यिकांची नावे पाठवली जाणार आहेत. ...
छगन भुजबळ, शरद पवार आणि त्यांचे सहस्रचंद्रदर्शन यांचा सध्यातरी साहित्य संमेलनाशी काहीही संबंध नाही. पुढे जर अशी काही वेळ आली तर तसा विचार करू, असे स्पष्टीकरण ठाले पाटील यांनी दिले. ...
sahitya sammelan संमेलनस्थळासाठी ही समिती फक्त नाशिकलाच भेट देणार असल्याने दिल्लीचा पत्ता कट झाल्याचे स्पष्ट आहे. मात्र, याबाबत साहित्य महामंडळाने अधिकृतपणे सांगण्यास नकार दिला. ...
नाशिक : नाशिकसह राज्यातील साहित्य विश्वात काव्याद्वारे ठसा उमटवलेले कुसुमाग्रजांचे मानसपुत्र ज्येष्ठ कवी आणि सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष किशोर पाठक (६८) यांचे शनिवारी (दि.२१) दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. ...