शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

जि.प.च्या २६७ शाळांचे होणार स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 11:52 PM

जिल्ह्यात वीसपेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या ३११ प्राथमिक शाळा ठाणे जिल्हा परिषदेच्या आहेत. यातील केवळ ४४ शाळा कायमच्या बंद होणार आहेत

ठाणे : जिल्ह्यात वीसपेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या ३११ प्राथमिक शाळा ठाणे जिल्हा परिषदेच्या आहेत. यातील केवळ ४४ शाळा कायमच्या बंद होणार आहेत, तर उर्वरित २६७ शाळांचे जवळच्या शाळांमध्ये स्थलांतर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, शाळा बंद व काहींचे स्थलांतर करण्याच्या मुद्यावरून गावकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जि.प. व पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान गावकºयांकडून जाब विचारला जाणार आहे.जि.प. व पं.स.च्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात प्रचार रंगात येत आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली राज्यात प्रथमच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातून सुरू झाल्या. याविषयी ‘जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी वाºयावर’ या मथळ्याखाली लोकमतने १९ नोव्हेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध करून हा विषय उघडकीस आणला. त्यास अनुसरून आक्रमक झालेल्या गावकºयांनी अंबरनाथसह शहापूर तालुक्यातील नागरिकांनीही जि.प. प्रशासनाला धारेवर धरले. त्याची वेळीच दखल घेत शिक्षण विभागाने दहापेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या शाळांचे सर्वेक्षण केले. त्यात ठाणे जिल्ह्यात सुमारे ४४ शाळा बंद करण्याचे निश्चित झाले असून उर्वरित सुमारे २६७ शाळा व त्यातील विद्यार्थ्यांचे जवळच्याच शाळांमध्ये स्थलांतर करण्याचा मार्ग काढण्यात आला आहे.जिल्ह्यातील शहापूरच्या १०९ शाळांसह भिवंडीच्या ५१ शाळा, कल्याणच्या १६, मुरबाडच्या १२० आणि अंबरनाथच्या १७ शाळांची पटसंख्या वीसपेक्षा कमी आहे. यातील दहापेक्षा कमी पटसंख्येच्या ४४ शाळांचा शोध घेऊन त्या बंद होणार आहे. २६७ शाळांचे अन्यत्र स्थलांतरण होणार आहे. या शाळाबंदचे संकट तूर्तास टळले असले, तरी स्थलांतर म्हणजेच संबंधित गावातील शाळा गावकºयांसाठी बंद होणार असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. यामुळे राजकीय पक्षांच्या प्रचारकांना या शाळांच्या मुद्यावर गावकºयांकडून जाब विचारला जाणार आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा