शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील यंदाचा नवरात्रोत्सव रद्द, जितेंद्र आव्हाड यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 3:51 PM

काही उत्सव मंडळे नवरात्र उत्सव साजरा करतात त्यांनी देखील काळजी घ्यावी, असे आवाहनही जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

ठाणे  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी ज्या पद्धतीने गणोशोत्सव साजरा केला, त्याच धर्तीवर आता नवरात्रोत्सवही साजरा करण्याची गरज असल्याचे मत राज्याचे गृहनिर्माण जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.

कळवा मुंब्रा या विधानसभा मतदार संघातही यंदा जो काही सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे, तो देखील रद्द करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तर जे काही उत्सव मंडळे नवरात्र उत्सव साजरा करतात त्यांनी देखील काळजी घ्यावी, असे आवाहनही जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

सप्टेंबर महिन्यात पुन्हा कोरोनाचा धोका वाढला आहे. रुग्ण वाढत असतांना मृत्यदर कमी आहे. मात्र म्हणून नवरात्र उत्सवाच्या काळात रात्री एकत्र येऊन भेटणे अयोग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. गर्दी करु नका, गरब्याचे आयोजन टाळा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

कळवा मुंब्रा या मतदार संघात मागील १० वर्षे मोठ्या उत्साहाने नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने गरब्याचेही आयोजन करण्यात येते. मात्र, यंदा कोरोनाचे सावट असल्याने येथील नागरिकांनी गरबा ठेवू नये किंवा नवरात्र उत्सवही रद्द करावा किंवा देवीचे आगमन कोणाच्या तरी घरात करावे, अशी विनंती केली होती. त्या अनुषंगाने कळव्यातील पारसिक नगरमध्ये होणारा नवरात्र उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. 

महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढत आहे, त्यामुळे या उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येणे, दर्शनाला जाणो टाळा असे आवाहनही त्यांनी केले. परंतु तसे न केल्यास पुढील दिवाळीही धोक्यात जाऊ शकते असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे इतर मंडळांनी देखील त्या दृष्टीने विचार करुन नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा किंवा रद्द करावा असे आवाहनही जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणेNavratriनवरात्रीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस