मुंबई: आधुनिक, सुसज्ज जागतिक दर्जाची बाजार साखळी उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात वाढवण पोर्ट येथे १,२०० एकरवर अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजार समिती उभारण्यात येईल. ही बाजारपेठ रस्ता, रेल्वे, बंदर व विमानतळाशी जोडलेली असेल, ज्यामुळे शेतीमालासाठी महाराष्ट्र जागतिक व्यापार केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास पणनमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.
'शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाची मोठी चळवळ' उभी राहिली
राज्यात शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) आणि शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीसी) या केवळ योजना नसून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाची मोठी चळवळ असल्याचे मंत्री रावल यांनी नमूद केले.
लहान शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांना बाजारपेठेत सक्षमपणे उभे करण्यासाठी या संस्थांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य कृषी पणन मंडळ व महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण केंद्र येथे शेतकरी उत्पादक संस्थांच्या परिषदेचे उद्घाटन रावल यांच्या हस्ते झाले. यावेळी रावल यांनी राज्या सध्या अस्तित्वात असलेल्या कृषी व्यवस्थेपेक्षा आधुनिक अशी बाजार साखळी उभारण्याची गरज व्यक्त केली.
उत्पादनासह ब्रडिंग, पॅकेजिंगही महत्त्वाचे
बदलत्या परिस्थितीत शेतकरी हा केवळ उत्पादक राहून चालणार नाही, तर तो उत्तम उद्योजक बनला पाहिजे. यासाठी पणन विभागाच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. याचबरोबर शेतीमालाच्या उत्पादनासोबतच त्याचे मार्केटिंग, ब्रेडिंग, पॅकेजिंग आणि विक्री या सर्व बाबींमध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घेतला पाहिजे. या प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी उत्पादक संस्थांच्या माध्यमातून चळवळ उभी राहील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
Web Summary : A world-class agricultural market will be established near Vadhvan Port on 1200 acres. This market aims to connect via road, rail, port, and airport, positioning Maharashtra as a global trade center. The government emphasizes empowering farmers through producer organizations, focusing on modernizing the agricultural supply chain.
Web Summary : वडवान बंदरगाह के पास 1200 एकड़ भूमि पर विश्व स्तरीय कृषि मंडी स्थापित की जाएगी। इस मंडी का लक्ष्य सड़क, रेल, बंदरगाह और हवाई अड्डे के माध्यम से जुड़ना है, जिससे महाराष्ट्र एक वैश्विक व्यापार केंद्र के रूप में स्थापित होगा। सरकार आधुनिक कृषि आपूर्ति श्रृंखला पर ध्यान केंद्रित करते हुए उत्पादक संगठनों के माध्यम से किसानों को सशक्त बनाने पर जोर दे रही है।