शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेचे पालन होणार आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 01:15 IST

विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच आचारसंहिता लागू झाली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये ती नावालाच असल्याचे दिसते आहे.

- धीरज परबविधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच आचारसंहिता लागू झाली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये ती नावालाच असल्याचे दिसते आहे. सामाजिक संघटना आणि जागरूक नागरिकांनी आचारसंहिता भंगची तक्रार केली तर पालिका, पोलीस अधिकारी आणि निवडणूक अधिकारी आणि पथके सोयीचे निकष लावून राजकारण्यांचा रोष नको म्हणून अंग झटकत आहेत. या बोटचेप्या धोरणामुळे आचारसंहितेचे प्रशासकीय यंत्रणाच धिंडवडे काढत आहे. त्यामुळे उल्लंघन होत असल्याचे उघड्या डोळ्यांनी दिसत असूनही तक्रार करावी की नाही, या द्विधा मनस्थितीत नागरिक सापडले आहेत.महापालिकेच्या २०१७ मध्ये निवडणुकीत आचारसंहितेचे धिंडवडे निघालेले नागरिकांनी पाहिले होते. भेटवस्तू वाटताना रंगेहाथ पकडलेल्यांवरही पालिका-पोलिसांनी कारवाई न करता प्रकरण दडपून टाकले होते. आचारसंहिता उल्लंघनासह गैरप्रकारांच्या तक्रारी असूनही प्रशासनाने वेळीच काटेकोर तपास न करता उलट राजकारणी त्यातून कसे सहिसलामत सुटतील, यासाठी राजकारण्यांना सहकार्य केले होते. लोकसभा निवडणुकीतही तसा अनुभव आला. प्रशासनाने आयोगाला आलेल्या तक्रारींवर चक्क खोटी आणि दिशाभूल करणारी उत्तरे पाठवून आचारसंहितेचा गळा घोटणाऱ्यांच्या बाजूने भूमिका कायम ठेवली. जागेवर बेकायदा जाहिरात फलक असल्याचा आयोगाच्या सी व्हिजिल अ‍ॅपमधून छायाचित्रे पाठवूनही पालिकेने कारवाई करण्याऐवजी फलक झाकून ठेवल्याची उत्तरे आयोगाला पाठवली होती.निवडणुकीच्या आचारसंहिता भंगासह एरवीच्या कामकाजातही नियमबाह्य आणि मनमानी राजकारण्यांना पाठीशी घालून त्यांचा राजकीय आणि आर्थिक फायदा करून देण्याचे सातत्याने आरोप आयुक्त बालाजी खतगावकर यांच्यावर झाले. तशा तक्रारी नागरिकांनी केल्या. लोकसभा निवडणूक आणि आताची विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीपासून जागरूक नागरिकांनी आयुक्तांविरोधात आयोगासह शासनाकडे तक्रारी केल्या. आयुक्त हे आचारसंहिताची अमलबजावणी करू शकणार नाहीत, तसेच पालिका अधिकारीही त्यांचीच री ओढणार असल्याने आयुक्तांच्या निलंबनासह बदलीच्या मागण्या केल्या गेल्या. नागरिकांच्या तक्रारी-मागण्यांना निवडणूक आयोग-शासनाने काडीची किंमत नसल्याचे पुन्हा दाखवून दिले.मीरा-भार्इंदरमधील जागरूक नागरिकांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी तक्रारी तसेच सनदी अधिकारी देण्याची मागणी धुडकावून लावल्याने शहरात आचारसंहितेचे सर्रास उल्लंघन होत आहे. तक्रारी होऊनही पालिका अधिकारी आणि संबंधित आचारसंहितेच्या पालनाची जबाबदारी असलेले दिशाभूल करणारे अहवाल पाठवण्यापासून एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत.एखादा धूर्त लोकप्रतिनिधी आचारसंहितेतून पळवाटा काढण्यासाठी वेगवेगळे हातखंडे अवलंबतो. स्वत:च्या नावाऐवजी आपल्या संस्थांची नावे वापरतो, तसेच पक्षाचे चिन्ह आणि नाव त्यात वापरतो. अशा कार्यक्रमांमध्ये राजकारणी प्रमुख अस्तित्व दाखवून प्रचार करतात. शहरात वाढदिवसाचे असंख्य होर्डिंग लावताना सर्वसामान्यांनाही कळते की, हा अमुक पक्षाचा अमुक लोकप्रतिनिधी व इच्छुक उमेदवार आहे म्हणून. त्याच्यासह त्याच्या सोबतच्या लोकप्रतिनिधी-पदाधिकाऱ्यांची छायाचित्रे असतात. यावरून लोकांमध्ये राजकीय प्रभाव आणि प्रचार सहज होत असतानाही प्रशासन जाहिरात पालिका ठेकेदाराच्या मान्यताप्राप्त होर्डिंगवर असल्याचा अहवाल देऊन तक्रारी दाबण्याचा प्रकार करत आहे.तक्रार दडपण्याचा भन्नाट दाखला म्हणजे भार्इंदर पूर्वेच्या बाळाराम पाटील मार्गावर भररस्त्यात राजकीय प्रचार साहित्य आणि झेंडा लावून सजवलेले वाहन कोणतीही परवानगी नसताना उभे करून राजकीय प्रचार केला जात आहे. मात्र, आचारसंहितेचे भरारी पथक असो वा अन्य संबंधितांनी कोणतीच कारवाई केली नाही. आता तर प्रचार वाहन ओवळा-माजीवडा मतदारसंघाच्या हद्दीत असल्याने तुम्ही कारवाई करा, असे मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघातील अधिकारी सांगतात.तर मतदारसंघ आमचा असला तरी प्रचार वाहनावरील साहित्य हे मीरा-भार्इंदर मतदारसंघाशी संबंधित असल्याचे ओवळा-माजिवडाचे अधिकारी सांगून केवळ कारवाई टाळण्यासाठी कांगावा करत सुटले आहेत. अन्य तक्रारींबाबतही तसाच कांगावा पालिका अधिकाºयांसह संबंधित विधानसभा मतदार संघाचे अधिकारी यांनी चालवला आहे. एकीकडे आयोगाने नागरिकांना जागरूकतेने तक्रारी करा म्हणून जाहिरातबाजी करायची आणि दुसरीकडे केलेल्या तक्रारींवर कारवाई न करता आचारसंहितेचे उल्लंघन आणि मोडतोड करणाºयांना पाठीशी घातले जात आहे.आचारसंहितेचा देखावा आणि त्यावर कोट्यवधींचा पैसा तरी कशाला खर्च करायचा, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019