शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

शहापूर तालुक्यात पांढऱ्या कांद्याचे पीक, पहिलाच प्रयोग ठरला यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 06:19 IST

शहापूर तालुक्यात प्रथमच घेतल्या गेलेल्या पांढºया कांद्याचे पहिल्याच प्रयत्नात विक्रमी उत्पादन घेऊन एका शेतकºयाने वेगळा उपक्र म राबवत आदर्श निर्माण केला आहे.

भातसानगर - शहापूर तालुक्यात प्रथमच घेतल्या गेलेल्या पांढºया कांद्याचे पहिल्याच प्रयत्नात विक्रमी उत्पादन घेऊन एका शेतकºयाने वेगळा उपक्र म राबवत आदर्श निर्माण केला आहे.तालुक्यातील खरिवली या गावातील शेतकरी नेहमीच भातसा कालव्याच्या पाण्यावर अनेक प्रकारच्या भाज्या तसेच भातशेतीचे उत्पादन घेत असतात. येथीलच स्वामी विशे हे आपल्या शेतीत नेहमीच काही ना काही प्रयोग करत असतात. यासाठी ते नेहमी तालुका कृषी अधिकाºयांकडून मार्गदर्शनदेखील घेत असतात.तीन एकर जागेत लावलेल्या आंब्याच्या बागेत एखादे आंतरपीक घेता येईल का, याचा विचार त्याने केला आणि तालुक्यात कधीही न पिकवलेला पांढरा कांदा विक्रमी उत्पादन देऊन गेला. याबरोबरच त्यांनी लाल कांद्याचे उत्पादनही घेतले आहे. आजपर्यंत खर्च वजा जाता त्यांना अडीच लाखांचा नफा मिळाला. तसेच कलिंगडाच्या एकाच वेलीवरून ठिबकच्या साहाय्याने तीन वेळा उत्पादन घेत आहे. या सर्व उत्पादनांची ते स्वत:च बाजारात विक्री करत असल्याने त्यापासूनही त्यांना लाख ते सव्वा लाख इतके उत्पन्न मिळेल, असा त्यांचा अंदाज आहे.आजपर्यंत आठ टन माल निघाला असून चार टन मालाची विक्री झाली आहे. या आंब्याच्या जागेतील कलिंगडाचे अंतर्गत पीक हे १२ टनापर्यंत निघेल, असा त्यांचा अंदाज आहे.तालुक्यात कुठेही पांढºया कांद्याचे उत्पादन घेतले जात नसतानाही या शेतकºयाने केलेला हा प्रयोग वाखाणण्याजोगा आहे. शिवाय, कलिंगडाचे अंतर्गत पीक घेऊन त्यांनी इतर शेतकºयांसमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे. त्यांना शेतीसाठी आवश्यक असणाºया शासकीय सुविधा दिल्या असून त्यांना सर्वतोपरी सहकार्य करत आहोत.- विलास झुंजारराव, तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती, शहापूरतालुक्यात शेतीच्या बाबतीत अनेक प्रयोग केले जात असून ते यशस्वी होत आहेत. याचे खरोखरच कौतुक वाटते.- वंदना भांडे, जि.प. सदस्या

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरीnewsबातम्या