शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

...तर मराठी पोरांना नोकरीसाठी गुजरातला जावे लागले; जितेंद्र आव्हाडांची टीका 

By अजित मांडके | Published: April 15, 2024 5:59 PM

गारपीटनंतर शरद पवार एकटेच शेतकऱ्यांच्यासाठी धावून जातात. बाकी सगळेच राजकारण करतात असेही ते म्हणाले.

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : रोजगार देणाऱ्या कंपन्या गुजरातला जातात. तर मराठी पोरांना रोजगार मिळणार कुठून आता आपल्या पोरांना नोकरीसाठी महाराष्ट्र सोडून गुजरातला जावे लागलं, अशी टीका  शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी करत, भारतात ८३ टक्के लोक बेरोजगार आहे. भारताचा विकासदर ४ पेक्षा खाली जाईल आणि तो गेला तर आपली परिस्थिती ही पाकिस्तान आणि श्रीलंका पेक्षा वाईटच असेल असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. याचदरम्यान त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, बंगाल, बिहार सगळीकडेच नाराजी आहेत. तर मग येवढ्या जागा आणणार कुठून पाकिस्तान मधून का? अशी बोचरी टीका करत, मोदी सरकारला डिवचण्याचे काम आव्हाडांनी केले आहे. तर, गारपीटनंतर शरद पवार एकटेच शेतकऱ्यांच्यासाठी धावून जातात. बाकी सगळेच राजकारण करतात असेही ते म्हणाले.

ठाण्यात सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना आव्हाडांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या आधी अनेक रोजगार मेळावे लागतात, ऑन ट्रेनी आणि अप्रेंटीसमध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकत नाही. असे सांगितले जाते. यावरून लोकांना येड बनवणं हेच यांचं काम असल्याचे दिसत आहे अशी टीकाही त्यांनी केली. तसेच पहिल्यांदा निवडून आल्यानंतर लोकांना आशा दाखवल्या. त्याचे काय झालं ते सांगा. तसेच दहा वर्षात दिलेली वचने किती पूर्ण केली ते सांगा. असा सवाल यावेळी त्यांनी केला आहे.

दहशत निर्माण व्हावी यासाठी गँगचा वापर - आव्हाड

गुंडांचे फोन येतात. हे शंभर टक्के खरं आहे. ते गुंड कोण आहेत, कोणत्या गॅंगचे आहेत,त्यांच्यावर किती मर्डर केसेस आहेत. किती गुन्हे आहेत याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. दहशत निर्माण व्हावी यासाठी गँगचा वापर केला जात आहे . आमदार रोहित पवार जे बोलले त्यात एक शब्दही खोटा नाही. असेही आव्हाडांनी यावेळी सांगितले.

गोडावूनवर जी कारवाई झाली ती १०० टक्के चुकीची आहे. उच्च न्यायालयाची स्टे आॅर्डर असतांना देखील कारवाई झाली आहे. त्या विरोधात मी कोर्टात गेलो आहे. दोन ते तीन दिवसात त्या संदर्भातील निर्णय येणे अपेक्षित असल्याचे मत भिवंडी लोकसभा मतदार संघाचे शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी व्यक्त केले.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर म्हात्रे हे जितेंद्र आव्हाड यांची भेट घेण्यासाठी ठाण्यात आले होते. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तीन दिवसापूर्वी देखील एक रस्ता तोडला, सीसी असून देखील वन खात्याकडून कारवाई केली गेली. अधिकाºयांवर देखील दबाव असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भिवंडी शरद पवार आणि उध्दव ठाकरे मिळून तीन सभा घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर यावेळी कपील पाटील यांनी भिवंडीत केवळ टक्केवारीचे राजकारण केले असून एवढ्या वर्षात त्यांनी येथील लोकांसाठी काय केले असा सवालही त्यांनी उपस्थित केला. निलेश सांबरे यांनी लढण्याचे संकेत दिले आहेत, मात्र त्यांनी अजून फॉर्म भरलेला नाही. मात्र अशा परिस्थितीत सर्वांना एकत्र होणे गरजेचे असल्याचे सांगत ही एकाच विचारांची लढाई असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड