शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

आमच्या हक्काचे पाणी मुरतेय कुठे? हे शोधा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 3:28 AM

महिलांचा सवाल : डोंबिवलीमधील म्हात्रेनगरमध्ये पाणीप्रश्न बनला गंभीर

अनिकेत घमंडीडोंबिवली : लघुपाटबंधारे विभागाच्या आदेशानुसार केडीएमसीने सप्टेंबरपासून पाणीकपात लागू केली आहे. मात्र, २० वर्षे आमचे पाणी नेमके कुठे मुरतेय, याचा शोध घ्या. भरमसाट मालमत्ताकर, पाणीबिले घेता तरीही आमच्या तोंडचे पाणी पळवले आहे. त्याला जबाबदार कोण, असा सवाल म्हात्रेनगर प्रभागातील त्रस्त महिलांनी ‘लोकमत’कडे केला. महापालिका अधिकाऱ्यांनी आधी पाणी द्यावे, मग बुस्टरवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

म्हात्रेनगरमध्ये १९९९ पासून पाणीसमस्या भेडसावत आहे. या प्रभागातील मारुती, आकृती, जागृती, बिंगो प्रसाद, कचरू भवन, सद्गुरू सेवासदन, सुदामा, अमरीश, अरुण, ओमधारा, अवंतिका, गणेश कृपा, बसवेश्वर, अमोलदीप आदी सोसायट्यांतील रहिवासी पाणी मिळत नसल्याने हैराण झाले आहेत. पाण्याचा दाब अत्यंत कमी असतो. जमिनीपासून फुटावर नळ असतानाही बादली भरत नाही. काही इमारतींत जेमतेम अर्धा तास पाणी येते. त्यातही तिसºया-चौथ्या मजल्यावर पाणीच येत नाही. त्यामुळे अनेकदा टँकर मागवावा लागतो. एका टँकरसाठी दोन हजार रुपये लागतात. महागाईमुळे टँकर मागवणेही परवडत नाही. टँकरमुळे कुटुंबाचे आर्थिक नियोजन कोलमडत आहे. लोकप्रतिनिधी, महापालिकेचे अधिकारी येतात-जातात, पण हा प्रश्न काही सुटत नाही. मग कर का भरायचे, असा प्रश्न रसिका जोशी, मेघा पाटील, मेघा चोरगे, सुमंगला नायर, वैशाली भोसले, मीनल टीकम, मानसी चोरगे, रश्मी खेंगरे आदी महिलांनी विचारला.पाण्याअभावी नातेवाइकांना घरी बोलावता येत नाही. तर घरांत कलहही वाढले आहेत. शेजाºयांशीही खटके उडतात. पाणी वापरताना काटकसर करावी लागत आहे. अनेकदा कागदी प्लेट, ग्लासचा वापर करावा लागत आहे, अशी व्यथा महिलांनी मांडली. २०१२ पासून पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. २०१६ मधील दुष्काळाच्या वेळी आठवडाआठवडा पाणी मिळाले नव्हते. यंदाही तशी स्थिती उद्भवण्याची शक्यता असल्याचे महिला म्हणाल्या.आयरे येथील दोनपैकी एका जलकुंभातून थेट पाणीपुरवठा केला जात असल्याचा महापालिकेच्या अधिकाºयांचा दावा आहे. त्यासाठी एक एमएलडीची तरतूद आहे. पण, प्रत्यक्षात पाणी मिळत नाही. ते मुरतंय कुठे? पाणी चोरणाºयांचा शोध घेण्याची आमची मागणी आहे. मात्र, महापालिका तो घेत नाही, अशी टीका महिलांनी केली.म्हात्रेनगर प्रभागात १७ लाख रुपये खर्चून नवी पाण्याची लाइन टाकण्याची वर्कआॅर्डर मंजूर झाली आहे. पण, ती टाकून काही उपयोग नाही. त्यासाठी आधी तीन तास चांगल्या दाबाने पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे.- मुकुंद पेडणेकर, नगरसेवकम्हात्रेनगरमध्ये काही ठिकाणी पाणीसमस्या आहे. ती लवकरच सुटण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी काही तांत्रिक बदल, क्रॉस कनेक्शन करणे आवश्यक आहे. त्यावर अभ्यास सुरू आहे. कनिष्ठ अभियंत्यांना तशा सूचना दिल्या आहेत. एका जलकुंभातून तेथे सुरळीतपणे पाणीपुरवठा होत आहे.- राजीव पाठक, अभियंता,पाणीपुरवठा विभाग, केडीएमसी 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाthaneठाणे