शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
3
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
5
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
6
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
7
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
8
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
9
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
10
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
11
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
12
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
13
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
14
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
15
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
16
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
17
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
18
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
19
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
20
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'

मुरबाडमध्ये भातखरेदी काट्याला मुहूर्त केव्हा?; शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 11:33 PM

व्यापाऱ्यांकडून कमी भाव 

मुरबाड :  मुरबाड तालुक्यातील भातपिकाला यंदा पावसाने तडाखा दिल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे कर्जाचा डाेंगर असलेल्या शेतकऱ्यांना आधारभूत खरेदी केंद्रे सुरू झाल्यावर आधार मिळेल, अशी आशा आहे. मात्र, खाजगी व्यापारी कवडीमाेल भावात खरेदी करून गेले तरी अद्याप आदिवासी विकास महामंडळाच्या भातखरेदी केंद्राच्या काट्याला मुहूर्तच सापडलेला नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

तालुक्यात आदिवासी विकास महामंडळ दूधनोली व माळ या दोन आदिवासी सेवा सहकारी संस्थांमार्फत भातखरेदी केंद्र सुरू करते. तर, मुरबाड तालुका खरेदी-विक्री संघही शासनाने ठरवून दिलेल्या भावानुसार भातखरेदी करतो. खरेदी-विक्री संघाने मुरबाड येथे केंद्र सुरू केले आहे. 

या ठिकाणी परिसरातील शेतकरी भातविक्रीसाठी आणतात, मात्र टोकावडे ते माळशेजघाट, बांडेशेत, वेळुक या परिसरातील शेतकरी ५० किमी अंतरावर असलेल्या मुरबाडला भात नेऊ शकत नाहीत. त्यांच्या सोयीचे केंद्र माळ आणि धसई ही आदिवासी विकास महामंडळाकडून सुरू केली जातात. ही दोन भातखरेदी केंद्रे सुरू करण्यात येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजाने मेहनतीने पिकवलेला भात धसई, सरळगाव बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने विकावे लागत आहे. 

शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून हाेणारी लूट थांबवण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांचा जास्त दिवस अंत न पाहता आदिवासी विकास महामंडळाला हमीभावाने भातखरेदी करण्यासाठी आदेश द्यावेत, अशी मागणी भाजप ठाणे जिल्हा ओबीसी उपाध्यक्ष संतोष भांगरथ यांनी केली आहे.

‘अडीच ते तीन हजार हमीभाव द्या’अवकाळी पावसामुळे भातपिकाची नासाडी झाली असली, तरी हाती आलेल्या भातपिकाची विक्री करूनच दैनंदिन गरजा भागवाव्या लागत आहेत. शासनाने फक्त १८६८ रुपये भाव क्विंटलला जाहीर केला आहे. एक क्विंटल भाताचे पीक घेण्यासाठी कमीतकमी दोन हजारच्या पुढचा खर्च येत आहे. निदान, शासनाने अडीच ते तीन हजार रुपये दर भाताला दिला, तर शेतकरी चिंतामुक्त होईल, अशी अपेक्षा बळीराजा व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी