शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेत येऊन काय मिळाले? माजी नगरसेवकाचा शिवसेनेला घरचा आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 01:32 IST

केडीएमसी हद्दीतील २७ गावांमधील एमआयडीसी निवासी भागात नागरी सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. सत्ता असल्याने विकास होईल, ही आशा फोल ठरल्याचे पत्रच येथील माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे

डोंबिवली : केडीएमसी हद्दीतील २७ गावांमधील एमआयडीसी निवासी भागात नागरी सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. सत्ता असल्याने विकास होईल, ही आशा फोल ठरल्याचे पत्रच येथील माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे व अन्य पदाधिकाºयांनी महापौर राजेंद्र देवळेकर यांना पाठवले आहे. ग्रामपंचायतीच्या राजवटीतून महापालिकेत आलो, परंतु सध्याची स्थिती पाहता ना घर का, ना घाट का, अशी आमची अवस्था झाल्याची खंतही त्यांनी पत्रात व्यक्त केलीआहे. शिवसेना पदाधिकाºयांचे पत्र पाहता हा एक प्रकारे सत्ताधाºयांना घरचा आहेर दिल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.सध्या निवासी भागातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे पुरती चाळण झाली आहे. कचराही नियमितपणे आणि वेळेवर उचलला जात नाही. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. कीटकनाशक फवारणी नियमित होत नसल्याने रोगराई पसरण्याचा धोका आहे. पावसाळ्यात गटारांमधील सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने बहुतांश भागांमध्ये पाणी साचते. रस्त्यांवरील पथदिवे सातत्याने बंद असतात. मिलापनगरमधील तलावाची नियमितपणे साफसफाई केली जात नसल्याने त्याला नाल्याचे स्वरूप आले आहे. या नागरी सुविधांच्या उडालेल्या बोजवाºयाबाबत स्थानिक नागरिकांमध्ये रोषाचे वातावरण आहे.शिवसेनेचे येथील आजीमाजी पदाधिकारी याप्रकरणी सातत्याने तक्रार करूनही महापालिका प्रशासनाकडून दाद दिली जात नसल्याचे महापौरांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे, माजी उपशहराध्यक्ष यशवंत तावडे, माजी विभागप्रमुख राजू नलावडे आणि विभागप्रमुख धर्मराज शिंदे यांनी हे पत्र महापौर देवळेकर व आयुक्त पी. वेलरासू यांनाही पाठवले आहे.अन्यथा मालमत्ताकर नभरण्याचा विचारएमआयडीसी निवासी विभाग २७ गावांसह केडीएमसीत १ जून २०१५ ला समाविष्ट झाला. तेव्हापासून येथील नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. याबाबत, सातत्याने पाठपुरावा करूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा होत नाही.सत्ताधारी म्हणून नागरिकांच्या रोषाला आम्हाला सातत्याने सामोरे जावे लागत आहे. याबाबतीत तातडीने हालचाल न झाल्यास मालमत्ताकर न भरण्याचा आम्ही विचार करू, असा इशारा संबंधित पदाधिकाºयांनी महापौरांना दिला आहे.विकासकामांची अपेक्षा दोन वर्षांत ठरली फोल-१९९५ मध्ये झालेल्या महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत मी शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलो. त्या काळी नगरसेवक निधी प्रारंभी दोन ते पाच लाखांपर्यंत वर्षाला मिळायचा. त्यातही महत्त्वाची नागरी हिताची कामे होत होती. परंतु, आजमितीला नगरसेवक निधीत वाढ होऊनही लोकप्रतिनिधींना प्रभागात कामे करण्यास निधी उपलब्ध होत नाही, ही शोकांतिका आहे, अशी खंत माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.१९९५ ते २००० कालावधीत निवासी भागातील रस्ते स्वत: महापालिकेकडे हस्तांतरित केले होते. तेव्हा त्याची डागडुजी व्हायची. परंतु, २००२ ते २०१५ या कालावधीत गावे वगळली गेल्याने पुन्हा कारभार ग्रामपंचायतीकडे आला. पण, पुन्हा गावे महापालिकेत आल्याने आतातरी विकासाची कामे होतील, अशी आशा होती. मात्र, दोन वर्षांत ती पुरती फोल ठरल्याचे म्हात्रे यांनी पत्रात म्हटले आहे.निवासी भागातील अंतर्गत रस्त्यांची अतिशय धूळधाण झाली आहे. करदात्या नागरिकांना त्या रस्त्याचा त्रास सोसावा लागत आहे. एमआयडीसीने ते रस्ते ताब्यात घेण्याबाबत केडीएमसीला पत्र दिले आहे. परंतु, ठोस कृती आजवर झालेली नसल्याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका