शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

पालिकेत येऊन काय मिळाले? माजी नगरसेवकाचा शिवसेनेला घरचा आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 01:32 IST

केडीएमसी हद्दीतील २७ गावांमधील एमआयडीसी निवासी भागात नागरी सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. सत्ता असल्याने विकास होईल, ही आशा फोल ठरल्याचे पत्रच येथील माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे

डोंबिवली : केडीएमसी हद्दीतील २७ गावांमधील एमआयडीसी निवासी भागात नागरी सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. सत्ता असल्याने विकास होईल, ही आशा फोल ठरल्याचे पत्रच येथील माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे व अन्य पदाधिकाºयांनी महापौर राजेंद्र देवळेकर यांना पाठवले आहे. ग्रामपंचायतीच्या राजवटीतून महापालिकेत आलो, परंतु सध्याची स्थिती पाहता ना घर का, ना घाट का, अशी आमची अवस्था झाल्याची खंतही त्यांनी पत्रात व्यक्त केलीआहे. शिवसेना पदाधिकाºयांचे पत्र पाहता हा एक प्रकारे सत्ताधाºयांना घरचा आहेर दिल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.सध्या निवासी भागातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे पुरती चाळण झाली आहे. कचराही नियमितपणे आणि वेळेवर उचलला जात नाही. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. कीटकनाशक फवारणी नियमित होत नसल्याने रोगराई पसरण्याचा धोका आहे. पावसाळ्यात गटारांमधील सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने बहुतांश भागांमध्ये पाणी साचते. रस्त्यांवरील पथदिवे सातत्याने बंद असतात. मिलापनगरमधील तलावाची नियमितपणे साफसफाई केली जात नसल्याने त्याला नाल्याचे स्वरूप आले आहे. या नागरी सुविधांच्या उडालेल्या बोजवाºयाबाबत स्थानिक नागरिकांमध्ये रोषाचे वातावरण आहे.शिवसेनेचे येथील आजीमाजी पदाधिकारी याप्रकरणी सातत्याने तक्रार करूनही महापालिका प्रशासनाकडून दाद दिली जात नसल्याचे महापौरांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे, माजी उपशहराध्यक्ष यशवंत तावडे, माजी विभागप्रमुख राजू नलावडे आणि विभागप्रमुख धर्मराज शिंदे यांनी हे पत्र महापौर देवळेकर व आयुक्त पी. वेलरासू यांनाही पाठवले आहे.अन्यथा मालमत्ताकर नभरण्याचा विचारएमआयडीसी निवासी विभाग २७ गावांसह केडीएमसीत १ जून २०१५ ला समाविष्ट झाला. तेव्हापासून येथील नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. याबाबत, सातत्याने पाठपुरावा करूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा होत नाही.सत्ताधारी म्हणून नागरिकांच्या रोषाला आम्हाला सातत्याने सामोरे जावे लागत आहे. याबाबतीत तातडीने हालचाल न झाल्यास मालमत्ताकर न भरण्याचा आम्ही विचार करू, असा इशारा संबंधित पदाधिकाºयांनी महापौरांना दिला आहे.विकासकामांची अपेक्षा दोन वर्षांत ठरली फोल-१९९५ मध्ये झालेल्या महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत मी शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलो. त्या काळी नगरसेवक निधी प्रारंभी दोन ते पाच लाखांपर्यंत वर्षाला मिळायचा. त्यातही महत्त्वाची नागरी हिताची कामे होत होती. परंतु, आजमितीला नगरसेवक निधीत वाढ होऊनही लोकप्रतिनिधींना प्रभागात कामे करण्यास निधी उपलब्ध होत नाही, ही शोकांतिका आहे, अशी खंत माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.१९९५ ते २००० कालावधीत निवासी भागातील रस्ते स्वत: महापालिकेकडे हस्तांतरित केले होते. तेव्हा त्याची डागडुजी व्हायची. परंतु, २००२ ते २०१५ या कालावधीत गावे वगळली गेल्याने पुन्हा कारभार ग्रामपंचायतीकडे आला. पण, पुन्हा गावे महापालिकेत आल्याने आतातरी विकासाची कामे होतील, अशी आशा होती. मात्र, दोन वर्षांत ती पुरती फोल ठरल्याचे म्हात्रे यांनी पत्रात म्हटले आहे.निवासी भागातील अंतर्गत रस्त्यांची अतिशय धूळधाण झाली आहे. करदात्या नागरिकांना त्या रस्त्याचा त्रास सोसावा लागत आहे. एमआयडीसीने ते रस्ते ताब्यात घेण्याबाबत केडीएमसीला पत्र दिले आहे. परंतु, ठोस कृती आजवर झालेली नसल्याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका