शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

पालिकेत येऊन काय मिळाले? माजी नगरसेवकाचा शिवसेनेला घरचा आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 01:32 IST

केडीएमसी हद्दीतील २७ गावांमधील एमआयडीसी निवासी भागात नागरी सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. सत्ता असल्याने विकास होईल, ही आशा फोल ठरल्याचे पत्रच येथील माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे

डोंबिवली : केडीएमसी हद्दीतील २७ गावांमधील एमआयडीसी निवासी भागात नागरी सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. सत्ता असल्याने विकास होईल, ही आशा फोल ठरल्याचे पत्रच येथील माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे व अन्य पदाधिकाºयांनी महापौर राजेंद्र देवळेकर यांना पाठवले आहे. ग्रामपंचायतीच्या राजवटीतून महापालिकेत आलो, परंतु सध्याची स्थिती पाहता ना घर का, ना घाट का, अशी आमची अवस्था झाल्याची खंतही त्यांनी पत्रात व्यक्त केलीआहे. शिवसेना पदाधिकाºयांचे पत्र पाहता हा एक प्रकारे सत्ताधाºयांना घरचा आहेर दिल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.सध्या निवासी भागातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे पुरती चाळण झाली आहे. कचराही नियमितपणे आणि वेळेवर उचलला जात नाही. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. कीटकनाशक फवारणी नियमित होत नसल्याने रोगराई पसरण्याचा धोका आहे. पावसाळ्यात गटारांमधील सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने बहुतांश भागांमध्ये पाणी साचते. रस्त्यांवरील पथदिवे सातत्याने बंद असतात. मिलापनगरमधील तलावाची नियमितपणे साफसफाई केली जात नसल्याने त्याला नाल्याचे स्वरूप आले आहे. या नागरी सुविधांच्या उडालेल्या बोजवाºयाबाबत स्थानिक नागरिकांमध्ये रोषाचे वातावरण आहे.शिवसेनेचे येथील आजीमाजी पदाधिकारी याप्रकरणी सातत्याने तक्रार करूनही महापालिका प्रशासनाकडून दाद दिली जात नसल्याचे महापौरांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे, माजी उपशहराध्यक्ष यशवंत तावडे, माजी विभागप्रमुख राजू नलावडे आणि विभागप्रमुख धर्मराज शिंदे यांनी हे पत्र महापौर देवळेकर व आयुक्त पी. वेलरासू यांनाही पाठवले आहे.अन्यथा मालमत्ताकर नभरण्याचा विचारएमआयडीसी निवासी विभाग २७ गावांसह केडीएमसीत १ जून २०१५ ला समाविष्ट झाला. तेव्हापासून येथील नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. याबाबत, सातत्याने पाठपुरावा करूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा होत नाही.सत्ताधारी म्हणून नागरिकांच्या रोषाला आम्हाला सातत्याने सामोरे जावे लागत आहे. याबाबतीत तातडीने हालचाल न झाल्यास मालमत्ताकर न भरण्याचा आम्ही विचार करू, असा इशारा संबंधित पदाधिकाºयांनी महापौरांना दिला आहे.विकासकामांची अपेक्षा दोन वर्षांत ठरली फोल-१९९५ मध्ये झालेल्या महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत मी शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलो. त्या काळी नगरसेवक निधी प्रारंभी दोन ते पाच लाखांपर्यंत वर्षाला मिळायचा. त्यातही महत्त्वाची नागरी हिताची कामे होत होती. परंतु, आजमितीला नगरसेवक निधीत वाढ होऊनही लोकप्रतिनिधींना प्रभागात कामे करण्यास निधी उपलब्ध होत नाही, ही शोकांतिका आहे, अशी खंत माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.१९९५ ते २००० कालावधीत निवासी भागातील रस्ते स्वत: महापालिकेकडे हस्तांतरित केले होते. तेव्हा त्याची डागडुजी व्हायची. परंतु, २००२ ते २०१५ या कालावधीत गावे वगळली गेल्याने पुन्हा कारभार ग्रामपंचायतीकडे आला. पण, पुन्हा गावे महापालिकेत आल्याने आतातरी विकासाची कामे होतील, अशी आशा होती. मात्र, दोन वर्षांत ती पुरती फोल ठरल्याचे म्हात्रे यांनी पत्रात म्हटले आहे.निवासी भागातील अंतर्गत रस्त्यांची अतिशय धूळधाण झाली आहे. करदात्या नागरिकांना त्या रस्त्याचा त्रास सोसावा लागत आहे. एमआयडीसीने ते रस्ते ताब्यात घेण्याबाबत केडीएमसीला पत्र दिले आहे. परंतु, ठोस कृती आजवर झालेली नसल्याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका