शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईच्या काळात विहिरींचा आधार

By admin | Updated: March 14, 2016 01:47 IST

पाणीकपातीमुळे शहरातील नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाल्याचा परिणाम शहरभर दिसत आहे. तर, आठवड्यातील तीन दिवस असलेल्या ठणठणाटाला दुर्लक्षित विहिरींचा आधार नागरिकांनी घेतला आहे.

भार्इंदर : पाणीकपातीमुळे शहरातील नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाल्याचा परिणाम शहरभर दिसत आहे. तर, आठवड्यातील तीन दिवस असलेल्या ठणठणाटाला दुर्लक्षित विहिरींचा आधार नागरिकांनी घेतला आहे.
आॅक्टोबर २०१५ पासून ३० टक्के पाणीकपात लागू केली आहे. यंदा त्यात वाढ झाली आहे. शहरासाठी पाण्याचा नवा स्रोत नसल्याने त्याचा फटका मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे. या कपातीमुळे आठवड्यातून केवळ चार दिवसच पाणीपुरवठा होत आहे. दोन वर्षांपूर्वी पालिका हद्दीतील जलसाठ्याचा वापर करण्याचा विचार प्रशासनस्तरावर सुरू झाल्यानंतर त्याला काही अधिकाऱ्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्याने त्याची नितांत आवश्यकता यंदा जाणवू लागली आहे.
शहरात सुमारे डझनभर सार्वजनिक विहिरी, ११ तलाव असा सहज उपलब्ध होणार जलसाठा आहे. शिवाय, मर्गाळी तलाव व चेना नदीचे अस्तित्व आहे. यातील मर्गाळी तलाव सध्या एमएमआरडीएच्या विशेष पर्यटन क्षेत्राच्या हद्दीत गेल्याने पालिका हद्दीत असलेल्या चेना नदीतील पाणी टँकरद्वारे उपसा करून ते पिण्याखेरीज इतर वापराकरिता देण्यासाठी तत्कालीन आयुक्त सुरेश काकाणी यांनी निविदा प्रक्रिया सुरू केली होती. परंतु, हे पाणी उपसणे अव्यवहार्य असल्याचा फतवा काढून त्याला प्रतिसादच मिळाला नसल्याचे कारण अधिकऱ्यांनीच पुढे केल्याने ती प्रक्रिया बासनात गुंडाळली आहे.
शहरात असलेल्या सार्वजनिक विहिरी स्वच्छ करून त्या नागरिकांच्या वापरासाठी खुल्या करण्याचे आदेश देऊनही त्याकडे आजतागायत दुर्लक्ष केले आहे. परंतु, याच विहिरी ऐन कपातीच्या काळात नागरिकांना आशेचा किरण ठरत आहेत. स्टेम व एमआयडीसीने गुरुवार ते शनिवारदरम्यान शहराला पाणीपुरवठा केलेला नाही. त्यामुळे शहरातील सर्वच नळ कोरडे पडल्याने नागरिकांचे हाल झाले. त्यामुळे नागरिकांनी थेट सार्वजनिक व खाजगी विहिरींकडे मोर्चा वळवून गरज भागवली. जोपर्यंत कपात लागू आहे, तोपर्यंत शहरातील सार्वजनिक विहिरी स्वच्छ करून त्यातील पाणीकपातीच्या काळात द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.