शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

बारवी धरणात 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2018 5:38 PM

कल्याण डोंबिवली महापालिका परिसरासर औद्योगिक विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असल्याची माहिती बारवी धरण प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. 

डोंबिवली- कल्याण डोंबिवली महापालिका परिसरासर औद्योगिक विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असल्याची माहिती बारवी धरण प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. डोंबिवली पत्रकार संघाच्या वतीने काल शुक्रवारी बारवी धरणाला भेट देण्यात आली. यावेळी ही माहिती दिली. बारवी धरणाची उंची वाढविण्यात आली आहे. त्यामुळे बारावी धरणात पाणीसाठा वाढणार आहे. त्यासाठी धरणाला 11 वक्र  पध्दतीचे दरवाजे बसविण्यात आले आहे. तोंडली, मोहघर, काचकोळी, सुकाळवाडी, कोळेवडखळ, मानिवली ही गावे आणि जांभूळवाडी, महरकवाडी, देवपाडा, खामघर,बुरडवाडी या पाडय़ातील सुमारे 765 कुटुंबियांचे पुनर्वसनाचे काम अंतिम टप्प्यात असून ते लवकरच पूर्ण होईल असा विश्वास अधिकाऱ्याने यावेळी व्यक्त केला. ज्या ठिकाणी  वक्र दरवाजे बसवण्यात आले आहेत. त्या 80 मी लांबीचा बांध दगडाने बांधण्यात आला आहे. धरणाचे तिसऱ्या टप्प्याचे बांधकाम सांडव्यार्पयत येऊन थांबले असून 68.60 मीटरवर स्वयंचलित दरवाजे बसविण्यात आले आहेत. नॉन ओव्हर फ्लो विभागाची उंची वाढवण्याचे काम 65 मीटर्पयत पूर्ण झाले आहे. सध्या हे वक्र दरवाजे उघडे करून ठेवण्यात आले आहेत. 

औद्योगिक विकास महामंडळाने बारवी धरणावर पाच मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत केंद्र उभारण्यास खाजगी तत्वावर परवानगी दिली असून वीज निर्मितीपासून महामंडळाची सुमारे 6 कोटी रूपयांची बचत होणार आहे. संपूर्ण क्षमतेने धरण भरल्यानंतर म्हणजे 340.48 द ल घ मी इतका साठा झाल्यानंतर वीजनिर्मिती सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. अजून पुर्नवसनाचे काम शिल्लक असल्याने यंदा ही धरणात पाणीसाठा 68.80 मीटर इतका होणार आहे. सध्या पंधरा दिवसातून एकदा पाणी कपात केली जाते. यामुळे 15 जुलैर्पयत आणखी पाणी कपात करण्याची गरज नाही. मात्र याचा निर्णय लघू पाटबंधारे विभाग घेते याकडे त्यांनी लक्ष वेधले.