शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

२१ दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 06:00 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पिसवली-गोळवली प्रभागात २१ दिवसांपासून पाणीटंचाई भेडसावत आहे. महापालिका प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त नागरिकांसह भाजपा नगरसेविका सुनीता खंडागळे व प्रभाग समिती सभापती सोनी अहिरे यांनी मंगळवारी दुपारी ४ वाजता महापालिका मुख्यालयात धाव घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पिसवली-गोळवली प्रभागात २१ दिवसांपासून पाणीटंचाई भेडसावत आहे. महापालिका प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त नागरिकांसह भाजपा नगरसेविका सुनीता खंडागळे व प्रभाग समिती सभापती सोनी अहिरे यांनी मंगळवारी दुपारी ४ वाजता महापालिका मुख्यालयात धाव घेतली. या वेळी त्यांनी तातडीने पाणीटंचाई दूर करण्याची मागणी केली. मात्र, कार्यकारी अभियंत्यांनी कामासाठी शटडाउन घ्यावा लागेल, त्यासाठी परवानगी घ्यावी लागेल, असे उत्तर देताच नगरसेविका व नागरिक भडकले.पिसवली प्रभागांत २१ दिवसांपासून पाणी येत नाही. मुळात पाणीसमस्या दोन वर्षांपासून भेडसावत आहे. या समस्येविषयी महापालिका व एमआयडीसी एकमेकांकडे केवळ बोट दाखवत आहेत. समस्या सुटत नसल्याने त्याचा त्रास येथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. इतके दिवस पाणी येत नसूनही महापालिकेला त्याचे काही सोयरसूतक नाही, असे रहिवासी अर्जुन सरोदे यांनी सांगितले.नगरसेविका खंडागळे म्हणाल्या, ‘प्रभागातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी मी दीड वर्षापासून प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. २७ गावांमध्ये पिसवलीचा समावेश होता. मात्र, आता गावे महापालिकेत आली आहेत. या गावांना आजही एमआयडीसी पाणीपुरवठा करत आहे. नळजोडणी देण्यासाठी महापालिकेने एमआयडीसीकडून ना-हरकत दाखला आणायला सांगितला. मी स्वत: जाऊन हा दाखला आणल्यानंतर नळजोडणी दिली. मात्र, जेथून जोडणी दिली, त्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठाच होत नाही. याबाबत विचारणा केली असता एमआयडीसी व महापालिका एकमेकांकडे बोट दाखवून माझी दिशाभूल करत आहेत. परिणामी प्रभागातील १८ हजार नागरिक पाण्याविना आहेत. त्यामुळे महापालिकेवर मी धडक दिली आहे.’महापालिकेच्या प्रभाग समिती आय-९ अंतर्गत पिसवली-गोळवली प्रभाग येतो. या प्रभाग समितीच्या सभापती व बसपाच्या नगरसेविका सोनी अहिरे यांनीही खंडागळे यांना पाणीप्रश्नीसाठी साथ दिली आहे. प्रभागातील पाण्याची समस्या तातडीने सोडवावी, जोडणी देण्याचे काम उद्या सुरू करा. त्यासाठी तातडीने शटडाउन घ्या, अशी मागणी त्यांनी केली.दरम्यान, नुकतेच नांदविलीत महिला पाण्यासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. धरणात पुरेसा पाणीसाठा असताना कल्याण-डोंबिवलीत पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो. पाणीपुरवठ्याचे नियोजन पालिका व एमआयडीसीकडे नाही, असेच यातून स्पष्ट होत आहे.सुरक्षारक्षकांनी प्रवेशद्वारावर रोखलेमहापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या सदस्यांनी नुकतेच आयुक्तांच्या दालनात खुर्ची फेको आंदोलन केले. त्यामुळे मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर अहिरे व खंडागळे यांना रोखण्यात आले.अहिरे व खंडागळे याही तशाच प्रकारे आंदोलन करू शकतात, या भीतीपोटी सुरक्षारक्षकांनी त्यांना प्रवेशद्वारावर रोखून धरले. त्या वेळी कार्यकारी अभियंता राजीव पाठक खाली आले. अहिरे, खंडागळे व नागरिकांनी त्यांना जाब विचारला.उद्याच शटडाउन घेण्याची मागणी त्यांनी केली. मात्र, शटडाउनसाठी परवानगी घ्यावी लागले. जोडणी देण्याचे काम केले जाईल, असे आश्वासन पाठक यांनी दिले. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविकेला प्रशासन जुमानत नाही हेच चित्र या घटनेतून पुन्हा समोर आले.