शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
5
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
6
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
7
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
8
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
9
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
10
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
11
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
12
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
13
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
14
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
15
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
16
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
17
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
18
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
19
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
20
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष

२१ दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 06:00 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पिसवली-गोळवली प्रभागात २१ दिवसांपासून पाणीटंचाई भेडसावत आहे. महापालिका प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त नागरिकांसह भाजपा नगरसेविका सुनीता खंडागळे व प्रभाग समिती सभापती सोनी अहिरे यांनी मंगळवारी दुपारी ४ वाजता महापालिका मुख्यालयात धाव घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पिसवली-गोळवली प्रभागात २१ दिवसांपासून पाणीटंचाई भेडसावत आहे. महापालिका प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त नागरिकांसह भाजपा नगरसेविका सुनीता खंडागळे व प्रभाग समिती सभापती सोनी अहिरे यांनी मंगळवारी दुपारी ४ वाजता महापालिका मुख्यालयात धाव घेतली. या वेळी त्यांनी तातडीने पाणीटंचाई दूर करण्याची मागणी केली. मात्र, कार्यकारी अभियंत्यांनी कामासाठी शटडाउन घ्यावा लागेल, त्यासाठी परवानगी घ्यावी लागेल, असे उत्तर देताच नगरसेविका व नागरिक भडकले.पिसवली प्रभागांत २१ दिवसांपासून पाणी येत नाही. मुळात पाणीसमस्या दोन वर्षांपासून भेडसावत आहे. या समस्येविषयी महापालिका व एमआयडीसी एकमेकांकडे केवळ बोट दाखवत आहेत. समस्या सुटत नसल्याने त्याचा त्रास येथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. इतके दिवस पाणी येत नसूनही महापालिकेला त्याचे काही सोयरसूतक नाही, असे रहिवासी अर्जुन सरोदे यांनी सांगितले.नगरसेविका खंडागळे म्हणाल्या, ‘प्रभागातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी मी दीड वर्षापासून प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. २७ गावांमध्ये पिसवलीचा समावेश होता. मात्र, आता गावे महापालिकेत आली आहेत. या गावांना आजही एमआयडीसी पाणीपुरवठा करत आहे. नळजोडणी देण्यासाठी महापालिकेने एमआयडीसीकडून ना-हरकत दाखला आणायला सांगितला. मी स्वत: जाऊन हा दाखला आणल्यानंतर नळजोडणी दिली. मात्र, जेथून जोडणी दिली, त्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठाच होत नाही. याबाबत विचारणा केली असता एमआयडीसी व महापालिका एकमेकांकडे बोट दाखवून माझी दिशाभूल करत आहेत. परिणामी प्रभागातील १८ हजार नागरिक पाण्याविना आहेत. त्यामुळे महापालिकेवर मी धडक दिली आहे.’महापालिकेच्या प्रभाग समिती आय-९ अंतर्गत पिसवली-गोळवली प्रभाग येतो. या प्रभाग समितीच्या सभापती व बसपाच्या नगरसेविका सोनी अहिरे यांनीही खंडागळे यांना पाणीप्रश्नीसाठी साथ दिली आहे. प्रभागातील पाण्याची समस्या तातडीने सोडवावी, जोडणी देण्याचे काम उद्या सुरू करा. त्यासाठी तातडीने शटडाउन घ्या, अशी मागणी त्यांनी केली.दरम्यान, नुकतेच नांदविलीत महिला पाण्यासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. धरणात पुरेसा पाणीसाठा असताना कल्याण-डोंबिवलीत पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो. पाणीपुरवठ्याचे नियोजन पालिका व एमआयडीसीकडे नाही, असेच यातून स्पष्ट होत आहे.सुरक्षारक्षकांनी प्रवेशद्वारावर रोखलेमहापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या सदस्यांनी नुकतेच आयुक्तांच्या दालनात खुर्ची फेको आंदोलन केले. त्यामुळे मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर अहिरे व खंडागळे यांना रोखण्यात आले.अहिरे व खंडागळे याही तशाच प्रकारे आंदोलन करू शकतात, या भीतीपोटी सुरक्षारक्षकांनी त्यांना प्रवेशद्वारावर रोखून धरले. त्या वेळी कार्यकारी अभियंता राजीव पाठक खाली आले. अहिरे, खंडागळे व नागरिकांनी त्यांना जाब विचारला.उद्याच शटडाउन घेण्याची मागणी त्यांनी केली. मात्र, शटडाउनसाठी परवानगी घ्यावी लागले. जोडणी देण्याचे काम केले जाईल, असे आश्वासन पाठक यांनी दिले. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविकेला प्रशासन जुमानत नाही हेच चित्र या घटनेतून पुन्हा समोर आले.