शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

थेंबभर पाण्यासाठी भटकंती, वाडा तालुक्यातील दुर्गम भागात नित्याचीच पाणीटंचाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 11:53 PM

वाडा तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओगदा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील दिवेपाडा, सागमाळ, जांभुळपाडा, टोकरेपाडा या पाड्यांतील सातशेहून अधिक नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

- वसंत भोईर

वाडा :  ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी एक म्हण मराठीत प्रचलित आहे. अशीच अवस्था वाडा तालुक्यातील दुर्गम, आदिवासी लोकवस्ती असलेल्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी धडपडणाऱ्या अनेक पाड्यांतील नागरिकांची झाली आहे. स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांत येथील नागरिकांना लोकप्रतिनिधींकडून पिण्याच्या पाण्याच्या सुविधा देण्याची फक्त आश्वासने मिळालेली आहेत. प्रत्यक्षात आश्वासनांची कार्यवाही न झाल्याने येथील नागरिकांना होळीनंतर पाऊस पडेपर्यंत पाण्यासाठी वणवण भटकत रहावे लागत आहे.वाडा तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओगदा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील दिवेपाडा, सागमाळ, जांभुळपाडा, टोकरेपाडा या पाड्यांतील सातशेहून अधिक नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या चारही पाड्यांपासून मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर धरण अवघे एक ते दोन किलोमीटर अंतरावर आहे. असे असतानाही स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांत येथील आदिवासींना पाण्यासाठी झगडावे लागत आहे.वाडा तालुक्याला पाच नद्यांची देणगी असूनही या पाण्याचे नियोजन नसल्याने तालुक्यातील अनेक गाव-खेड्यांतील नागरिकांना उन्हाळ्यातील दोन ते तीन महिने तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. येथील नागरिकांचा पिण्याच्या, सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी तालुक्यात असलेल्या पाच नद्यांपैकी कुठेतरी एखादे मोठे धरण व्हावे, अशी मागणी तालुक्यातील एकाही लोकप्रतिनिधींनी केलेली नाही.वाडा तालक्यातील भूमिपुत्र असलेले दामोदर शिंगडा हे २५ वर्षे खासदार होते, ल. का. दुमाडा हे पाच वर्षे खासदार होते, शंकर आबा गोवारी हे दहा वर्षे आमदार होते; तर या जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री विष्णू सवरा हे ३० वर्षे आमदार होते. यामधील सहा वर्षे ते आदिवासी विकासमंत्रीही होते. वाडा तालुक्याला सध्या दौलत दरोडा, सुनील भुसारा, शांताराम मोरे असे तीन आमदार असताना अनेक गावांमधील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असेल, तर यासारखे दुर्दैव ते कोणते? असा सवाल आदिवासी उपस्थित करू लागले आहेत.

पिण्याच्या पाण्यासाठी येथील महिलांना रात्रंदिवस भटकंती करावी लागत असल्याने त्यांचा रोजगार बुडतो.- गणपत दोडे, माजी सरपंच,ओगदा ग्रामपंचायत

पाणीटंचाई असलेल्या ओगदा व तुसे परिसरातील काही पाड्यातील नागरिकांची टँकर मागणी आलेली आहे. लवकरच येथे टँकरने पाणीपुरवठा केला जाईल.- विनोद गुजर, पाणीपुरवठा विभाग,पंचायत समिती, वाडा.

टॅग्स :Waterपाणीpalgharपालघर