शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
4
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
5
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
8
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
9
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
10
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
11
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
12
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
13
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
14
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
15
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
16
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
17
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
18
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
19
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
20
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....

‘वालधुनी’चे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट; आरोग्य विभागाचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 00:02 IST

मलंगगडाच्या डोंगरातून वाहणारी वालधुनी नदी उगमापासून प्रदूषित असून तिचे पाणी पिण्यास योग्य नसल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिला आहे.

कल्याण : मलंगगडाच्या डोंगरातून वाहणारी वालधुनी नदी उगमापासून प्रदूषित असून तिचे पाणी पिण्यास योग्य नसल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिला आहे. त्यामुळे नदीचे प्रदूषण थांबणार कधी, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.सह्याद्रीच्या खोऱ्यातील मलंग गडाच्या डोंगरातून वालधुनी नदी उगम पावते. ती अंबरनाथ ते कल्याण खाडीदरम्यान ३१ किलोमीटर लांब वाहते. नदीच्या तिरावर १० व्या शतकात बांधलेले अंबरनाथचे पुरातन शिवमंदिर आहे. १९२३ मध्ये काकोळे येथे ब्रिटिशांनी जीआयपी टँक बांधला. त्याची क्षमता सहा दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची आहे. या टँकमधून कल्याण रेल्वेस्थानकाला पाणीपुरवठा होत असत. परंतु, वाढत्या नागरीकरणामुळे वालधुनी नदीची गटारगंगा झाली आहे. ही नदी उगमापासूनच प्रदूषित असल्याचा अहवाल उल्हासनगरातील चांदीबाई महाविद्यालयाने केलेल्या ‘सेव्ह गुड अर्थ’ या प्रकल्पाद्वारे दिला होता. केंद्रीय प्रदूषण अहवालात देखील ही नदी प्रदूषित असल्याचे म्हटले आहे.उगम परिसरात या नदीचे पाणी स्वच्छ होते. आता कोकाळे गावानजीक पाणी काळेशार झाले आहे. त्यात रासयानिक कारखाने रसायनमिश्रित सांडपाणी सोडत असल्याने नदी प्रदूषित झाली आहे. वालधुनी नदी पुढे उल्हास नदीला कल्याण खाडीनजीक जाऊन मिळते. त्यामुळे खाडीही प्रचंड प्रदूषित झाली आहे.अंबरनाथ तालुक्यात वालधुनी नदीच्या आसपासच्या गावात फळ, भाजीपाल्याची शेती या पाण्यावर केली जात होती. मात्र, आता हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने त्याला गुरेही तोंड लावत नाहीत. सध्या थोडीफार शेती आहे. नदीचे ते दूषित पाणी फळभाज्यांच्या शेतीला वापरल्यास त्यापासून आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. नदी उल्हासनगर व कल्याणमध्ये अति प्रदूषित आहे. तेच पाणी पुढे कल्याण खाडीत जाऊन मिळते. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळ व महापालिकेस त्याच्याशी काही देणेघेणे नाही. हा एक प्रकारे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. त्यावर कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार, या प्रश्नाला उत्तरच नाही.प्र्रकरण न्यायप्रविष्ट : नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ‘वनशक्ती’ ही पर्यावरण संस्था २०१३ पासून राष्ट्रीय हरित लवादाच्या माध्यमातून लढा देत आहे. लवादाने नदी प्रदूषित करणाºयांना ९५ कोटींचा दंड ठोठावला आहे. मात्र, हा दंड अद्याप भरला गेलेला नाही. या दंडाच्या रकमेतून नदी प्रदूषण रोखले जाणार होते. हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे प्रदूषण कधी थांबणार, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणriverनदीthaneठाणे