शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

पोलीस ठाण्याला मुख्यमंत्र्यांची प्रतीक्षा, सहा महिन्यांपासून खोळंबले उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 3:19 AM

ठाणे ग्रामीण पोलिसांच्या सागरी पोलीस ठाण्याची नवीन वास्तू गेल्या सहा महिन्यांपासून बांधून पूर्ण असली, तरी तिच्या उद्घाटनाकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मिळत नसल्याने ती सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे.

- राजू काळेभार्इंदर : ठाणे ग्रामीण पोलिसांच्या सागरी पोलीस ठाण्याची नवीन वास्तू गेल्या सहा महिन्यांपासून बांधून पूर्ण असली, तरी तिच्या उद्घाटनाकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मिळत नसल्याने ती सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे. या बांधून पूर्ण झालेल्या पण वापर होत नसलेल्या पोलीस ठाण्याच्या भाड्यापोटी ठाणे ग्रामीण पोलीस दरमहा ११ हजार रुपये मोजत आहेत.शहरात १९९२ पूर्वी काशिमीरा व भार्इंदर ही दोनच पोलीस ठाणी होती. १९९२ नंतर मीरा रोड येथील कनाकिया परिसरात नवीन पोलीस ठाणे सुरू करण्यात आले. तद्नंतर भार्इंदर पूर्वेस नवघर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. ही पोलीस ठाणी सरकारी जागेत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मीरा-भार्इंदर शहर मुंबईला लागून असल्याने शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्याप्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागले आहे. २०१३ मध्ये उत्तनच्या आनंदनगर येथे नवीन उत्तन सागरी पोलीस ठाणे सुरू करण्यात आले. हे पोलीस ठाणे सध्या भाडेतत्त्वावरील वास्तूत सुरू असून त्यात पोलीस कर्मचाऱ्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शहराच्यापश्चिमेस सुमारे ८ ते १० किलोमीटरचा सागरी किनारा असल्याने त्याच्या सुरक्षेसह तेथील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने नवे पोलीस ठाणे उभारण्याचे ठरले. २०१५ मध्ये नयानगर पोलीस ठाणेसुद्धा एका अपुºया जागेत सुरू करण्यात आले. या दोन्ही पोलीस ठाण्यांत लॉकअपसह अनेक गैरसोयी असल्याने महिला कर्मचाºयांची मोठी कुचंबणा होत आहे.दरम्यान, शहरात पोलीस आयुक्तालय सुरू करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र, त्यासाठी पुरेशी जागाच उपलब्ध न झाल्याने अखेर ते वसई येथे सुरू केले जाणार असल्याचे राज्य सरकारकडून अलीकडेच जाहीर करण्यात आले. या आयुक्तालयाच्या कक्षेत शहराचा समावेश होणार असला, तरी या सहा पोलीस ठाण्यांत आजही अत्यल्प मनुष्यबळ तैनात आहे. लोकसंख्येच्या तुलनेत एक हजार नागरिकांमागे किमान एक पोलीस कर्मचारी असणे अपेक्षित आहे. शहराची लोकसंख्या सुमारे १२ लाखांहून अधिक असली व जनगणनेनुसार ती सुमारे आठ लाख १४ हजार इतकीच असली, तरी या सहा पोलीस ठाण्यांत लोकसंख्येच्या प्रमाणात ८०० हून अधिक पोलीस कर्मचाºयांची नियुक्ती होणे अपेक्षित आहे. परंतु, सध्या एकूण ५०८ कर्मचारीच तैनात आहेत. त्यात सुमारे ३० ते ३५ अधिकाºयांचा समावेश आहे. शहरात पोलीस ठाणी वाढली पण मनुष्यबळ तुटपुंजेच राहिले. अशातच २०१५ पासून अधिकाºयांनी गृह विभागाकडे पाठपुरावा करून उत्तन सागरी पोलीस ठाण्याला उत्तन-गोराई मार्गावरील सर्व्हे क्रमांक २०१ (अ) ही सुमारे एक एकर सरकारी जमीन उपलब्ध करून दिली. त्यावर सहा महिन्यांपूर्वीच सागरी पोलीस ठाण्याच्या एकमजली इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. परंतु, गेल्या सहा महिन्यांपासून हे पोलीस ठाणे सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन करण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकारी आहेत. पण, मुख्यमंत्र्यांची वेळच मिळत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. सहा महिन्यांपासून धूळखात पडलेल्या या पोलीस ठाणाच्या जागेच्या भाड्यापोटी ठाणे ग्रामीण पोलिसांना दरमहा ११ हजार रुपये भाडे राज्य सरकारला अदा करावे लागत आहे.याबाबत मला काहीच माहिती नाही. अधिक माहिती घेतो.- अतुल कुळकर्णी, सहायक पोलीस अधीक्षक

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस