शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

गाव तिथे म्हाडा संकल्पना राबविणार, कृती आराखडाही तयार करणार; जितेंद्र आव्हाडांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 4:33 PM

उर्वरीत घरांची लॉटरी काढली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठाणे : म्हाडांच्या घरांना मिळालेला लाभ हा भविष्यात मोठे आव्हान असणार आहे. परंतु असे असले तरी प्रत्येकाच्या घराचे स्वप्न साकार करणोही गरजेचे आहे. त्यामुळेच आता गाव तिथे म्हाडा ही संकल्पना राबविली जाणार असल्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. त्याचा कृती आराखडा देखील तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

म्हाडाच्या माध्यमातून ८ हजार ९८४ घरांची सोडत गुरुवारी ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणोकर नाटय़गृहात काढण्यात आली. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. आज जो काही प्रतिसाद मिळाला आहे, त्यामुळे लोकांना घराची किती गरज आहे, हे समजले. त्यामुळे भविष्यात निश्चितच आव्हान असणार असल्याचेही त्यांनी सांगितले. म्हाडाच्या माध्यमातून महाड येथे उधवस्त झालेल्या गावांच्या ठिकाणी ६०० चौरस फुटांची २६१ घरे उभारण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले मागील २५ वर्षे रखडलेला बीडीडी चाळीची पुनर्विकासही आता खऱ्या अर्थाने सुरु झाला आहे. ठाण्यातील वर्तकनगर भागात म्हाडाच्या माध्यमातून १२०० घरे उपलब्ध होणार आहेत. त्यातील ४०० घरे ५०० चौरस फुटांची असणार ती पोलिसांसाठी असणार आहेत.

उर्वरीत घरांची लॉटरी काढली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय नवीमुंबईत आयटी सेक्टर वाढत आहे, त्याठिकाणी झोपडपटया देखील अधिक आहेत. परंतु आता एसआरए योजनेचा विस्तार हा ठाणो जिल्ह्यात झालेला आहे. त्यामुळे नवीमुंबईत झोपडपटटींचा पुनर्विकास करुन त्याच ठिकाणी आयटी सेक्टरलाही जागा उपलब्ध करुन दिल्यास नागरीकांना घराजवळच नोकरीच्या संधी देखील उपलब्ध होतील, त्यामुळे यावर विचार करावा अशा सुचनाही त्यांनी यावेळी संबधींत विभागाला दिल्या. मोतीलाल नगर येथील १४६ एकरचा भुखंड उपलब्ध झालेला आहे, त्याठिकाणी देखील विकास करणो शक्य होणार आहे. पत्रचाळीचा पुनर्विकासही आता सुरु झाला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कन्मवार नगर, टागोर नगर आदी भागातील एका एका इमारतीचा विकास न करता त्याचा एकत्रित कृती आराखडा तयार करुन येथील इमारतींचा पुनर्विकास केल्याने मराठी माणसाला त्याठिकाणी स्वस्तात घरे उपलब्ध होतील त्यादृष्टीनेही विचार करावा अशा सुचना त्यांनी केल्या. ठाणो जिल्ह्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापुर, घोडबंदर आदी कुठेही २५ एकर र्पयत जागा उपलब्ध करुन दिल्यास त्याठिकाणी म्हाडाच्या माध्यमातून विकास करण्यास सोईच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त करतांना ही जागा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडmhadaम्हाडा