शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

Vidhan sabha 2019 : अर्ज भरताना उमेदवारासोबत केवळ चार कार्यकर्त्यांना प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 1:25 AM

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात उमेदवारासोबत केवळ चार कार्यकर्त्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

ठाणे : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात उमेदवारासोबत केवळ चार कार्यकर्त्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.निवडणूक निर्णय अधिकाºयाच्या कार्यालयाच्या चहुबाजूने शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी शंभर मीटर परिसरात कलम १४४ ( २) अन्वये ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मनाई आदेश लागू केले आहेत.ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, ओवळा माजिवडा, कोपरी पाचपाखाडी, ठाणे, मुंब्रा कळवा या १३ विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे.या १३ विधानसभा क्षेत्र कार्यालयांच्या परिसरात कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रतिनिधी आदींना बैठक, पत्रकार परिषद आदी कार्यक्र म घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या कार्यालयांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात नामनिर्देशन अर्ज दाखल करणारा उमेदवार व त्याच्यासोबत चार व्यक्तींना प्रवेश देण्यात येणारआहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्यास येणाºया उमेदवारास नमूद ठिकाणच्या कार्यालयाच्या शंभर मीटरच्या चहूबाजूकडील परिसराच्या आत फक्त तीन वाहने आणण्याची परवानगी देण्यात आली आहे.तीनपेक्षा अधिक वाहने सदर कार्यालयाच्या शंभर मीटर परिसरात आणण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. हा आदेश ७ आॅक्टोबर मध्यरात्रीपर्यंत अंमलात राहणार आहे. या मनाई आदेशाचा भंग केल्यास कलम १८८ अन्वये कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला असल्याने कार्यालयातील गोंधळाचे वातावरण टाळता येणार आहे.खर्चाच्या तक्रारीसाठी निवडणूक खर्च निरीक्षकठाणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांत सहा केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. या निरीक्षकाना भेटून संबंधित उमेदवारांच्या खर्चाबाबत तक्रार करणे शक्य होणार आहे. यासाठी नागरिकांना त्यांच्या ठिकठिकाणच्या कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान भेटता येणार आहे.निरीक्षकांच्या वास्तव्याचे ठिकाणी नारिकांना भेटून तक्रार करता येणार आहे. यामध्ये भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व या मतदारसंघांतील उमेदवारांची तक्रार निवडणूक खर्च निरीक्षक विवेकानंद यांना विद्युत पारेषण गेस्ट हाऊस, तळमजला, पडघा येथे दिलेल्या वेळेत भेटता येणार आहे. शहापूर, कल्याण पश्चिम, मुरबाड मतदारसंघातील उमेदवाराच्या खर्चाची तक्रार निरीक्षक आशिषचंद्र मोहंती यांना त्यांच्या सेंच्युरी रेयॉन गेस्ट हाऊस, वसंत विहार, कल्याण येथील कार्यालयात करण्याची परवानगी दिली आहे.अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व या तीन मतदारसंघांच्या तक्रारीसाठी खर्च निरीक्षक एस.आर. कौशिक यांना आयुध निर्माणी गेस्ट हाऊस, अंबरनाथ येथील कक्ष क्रमांक ५ व ६ येथे जावून भेटता येणार आहे. डोंबिवली, कल्याण ग्रामीण, ठाणे या मतदारसंघांतील तक्रारीसाठी शिवस्वरूप सिंग, यांना कक्ष क्र .४, डोंबिवली जिमखाना, डोंबिवली येथे संपर्क साधता येणार आहे. मीरा- भार्इंदर, ओवळा-माजिवाडा, कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघांतील उमेदवारांची तक्रार निरीक्षक उमेश पाठक यांच्याकडे कक्ष क्र .२७, रेमंड गेस्ट हाऊस येथे व रूम नं.२, सूर्या, शासकीय विश्रामगृह, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, ठाणे (प.) येथे करता येईल. मुंब्रा-कळवा, ऐरोली, बेलापूर या मतदारसंघांसाठी तक्रार के. रमेश यांच्याकडे नागरिकांना रूम नं.४, सिडको गेस्ट हाऊस, किल्ले गावठान बेलापूर, नवी मुंबइ, येथे जावून दिलेल्या वेळेत म्हणजे सकाळी ११ ते दुपारी १२ दरम्यान करता येईल.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019