शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी ५८ टक्के मतदान; १२६ जागांवरील ६९२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद
3
इराण-अमेरिका युद्ध टळले? सैनिक कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर परतले; इराणनेही हवाई क्षेत्र उघडले
4
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
5
Maharashtra Municipal Election Exit Polls : जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ? एक्झिट पोलचे अंदाज वाचा
6
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
7
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
8
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
9
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
10
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
11
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
12
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
13
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
14
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
15
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
16
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
17
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
18
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
19
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
20
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
Daily Top 2Weekly Top 5

Video: ठाण्यात 'वीर सावरकर मार्ग' फलकाची दुरावस्था; मनसेने केले भाजपावर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 15:06 IST

वीर सावरकरांचा अभिमान आम्हालाही आहे पण नावापुरतं राजकारण करायचं हे भाजपाचं काम आहे.

ठळक मुद्देवीर सावरकरांचा अभिमान आम्हालाही आहे पण नावापुरतं राजकारण करायचं हे भाजपाचं कामदुष्काळ, शेतकरी, पाण्याचा विषय असताना याकडे दुर्लक्ष भाजपाकडून सावरकरांचे नाव घेऊन राजकारण

ठाणे - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावरुन भाजपाने आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलं. राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला असून त्यांनी माफी मागावी अशी आग्रही मागणी भाजपाने केली. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे पडसाद नागपूर हिवाळी अधिवेशनातही उमटले. 

भाजपा आमदार मी पण सावरकर अशा नावाच्या टोप्या घालून विधिमंडळ आले, राहुल गांधी यांच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या. मात्र भाजपाकडून सावरकरांचे नाव घेऊन राजकारण केले जात आहे. दुष्काळ, शेतकरी, पाण्याचा विषय असताना याकडे दुर्लक्ष करुन फक्त वीर सावरकरांच्या नावाने राजकारण करायचे असा आरोप मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी भाजपावर केला. 

तसेच ठाण्यात वीर सावरकर मार्ग अशा नावाच्या पाटीची दुरावस्था मनसेने समोर आणली. भाजपा आमदार संजय केळकर यांच्या कार्यालयापासून १०० मीटर अंतरावर वीर सावकर मार्ग पाटी लावण्यात आली आहे. मात्र दुर्लक्षित असल्याने या पाटीवर अस्वच्छता अन् थुंकण्याचे डाग पडल्याचे दिसून आलं. यावरुन मनसेने भाजपाला कोंडीत पकडले. 

याबाबत बोलताना अविनाश जाधव म्हणाले की, वीर सावरकरांचा अभिमान आम्हालाही आहे पण नावापुरतं राजकारण करायचं हे भाजपाचं काम आहे. महाराष्ट्रातील गंभीर विषय स्वत:च्या स्वार्थासाठी बाजूला ठेवता असा आरोप करत या प्रभागात भाजपाचे नगरसेवक आहेत, आमदार संजय केळकर यांचे कार्यालयही हाकेच्या अंतरावर आहे असं असतानाही येता-जाता वाटेवरुन कधीही त्यांचे लक्ष या पाटीकडे गेले नाही. वीर सावरकर यांचे पुतळे, पाटी अशा ठिकाणची दुरावस्था काय आहे त्याकडे भाजपाने लक्ष द्यावं अशी मागणी त्यांनी केली. त्याचसोबत मनसेच्या स्वखर्चातून वीर सावरकर मार्ग या पाटीची दुरुस्ती करण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली. 

विधानसभेच्या सभागृहात देवेंद्र फडणवीस यांनी वीर सावरकर यांचं देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान मांडत, काँग्रेस नेत्याने त्यांचा अपमान केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. परंतु, हे बोलणं रेकॉर्डवर न घेण्याचे निर्देश विधानसभाध्यक्षांनी दिले. त्यामुळे चिडलेल्या विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली, कामकाज पुन्हा सुरू होताच फडणवीस यांनी आपला मुद्दा लावून धरला. सावरकरांविषयी बोललेलं रेकॉर्डवर घेतलं जाणार नसेल तर त्यांच्याबद्दल कुठे बोलायचं? ही महाराष्ट्राची विधानसभा आहे की इंग्रजांची विधानसभा आहे?, असा संताप त्यांनी व्यक्त केला होता.  

टॅग्स :MNSमनसेAvinash Jadhavअविनाश जाधवBJPभाजपाVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरRahul Gandhiराहुल गांधी