शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

पालेभाज्या, टोमॅटोने थंडीतही फोडला घाम; आवक घटल्याने दरवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 4:15 AM

हिवाळ्यात पालेभाज्यांचे भाव काहीसे उतरतात. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळतो.

ठाणे : हिवाळ्यात पालेभाज्यांचे भाव काहीसे उतरतात. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळतो. मात्र, यंदा नोव्हेंबरअखेरपासूनच तीव्र पाणीटंचाईची झळ बसून पालेभाज्यांची आवक ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाल्याने २५ ते ३0 टक्के भाववाढ झाली आहे. कोथिंबीर आणि मेथीच्या जुडीचा भाव उच्चांकीस्तरावर पोहोचला आहे. थंडीचा कडाका वाढल्याने टोमॅटो लवकर पिकत नाहीत. त्यामुळे आवक घटल्याने भाव वधारले आहेत, असे भाजीविक्रेत्यांनी सांगितले.थंडी पडू लागली की, भाज्यांची आवक वाढून भाव घसरतात. मात्र, यंदा कमी पावसामुळे नोव्हेंबरपासूनच पाण्याची कमतरता जाणवत आहे. त्याचा उत्पादनावर परिणाम होऊन ऐन थंडीत पालेभाज्यांचे भाव वधारल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडत आहे. मार्गशीर्ष महिना असल्याने त्याची तीव्रताही जाणवत आहे. दरम्यान, उन्हाळ्यात भाजीपाल्याचे भाव आणखी वधारण्याची शक्यता भाजीविक्रेते संभाजी खेडेकर यांनी व्यक्त केली आहे. कडाक्याच्या थंडीमुळे टोमॅटो लवकर पिकत नसल्याने शेतकरी बाजारात कमी प्रमाणात माल पाठवत आहेत. त्यामुळे टोमॅटोचे भाव २० ते २५ रुपयांवरून ३० ते ४० किलो रुपयांवर पोहोचला आहे, असे भगवान तुपे यांनी सांगितले. वाटाणा स्वस्त झाला असून २० ते २५ रुपये किलोने मिळत आहे. सध्या ठाण्याच्या बाजारपेठेमध्ये नाशिक, पुणे या भागांतून भाज्यांची आवक होत असून पालेभाज्यांची आवक ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाल्याचे खेडेकर यांनी सांगितले.

टॅग्स :vegetableभाज्या