शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
2
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
3
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
4
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
5
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
6
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
7
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
8
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
9
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
10
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
11
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
12
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
13
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
14
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
15
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
16
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
17
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
18
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
19
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
20
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल

गुळात कृत्रिम खाद्य रंगाचा वापर; कोल्हापूर, सांगलीतील उत्पादकांना प्रत्येकी पाच लाखांचा दंड

By जितेंद्र कालेकर | Updated: October 3, 2022 17:39 IST

आहारात साखरेचे प्रमाण कमी असावे याची सर्वसामान्यांना आता जाणीव होऊ लागल्याने साखरेला पर्याय अनेकजण गुळाची निवड करतात.

ठाणे - झटपट चांगला नफा मिळविण्यासाठी गुळात कृत्रिम खाद्य रंगाचा वापर करणाऱ्या  सांगली आणि कोल्हापूर येथील उत्पादकांना चांगलेच महागात पडले आहे. या दोन्ही उत्पादकांना अन्न व औषध प्रशासन विभागाचे कोकण विभाग सह आयुक्त (अन्न) तथा न्यायनिर्णय अधिकारी सुरेश देशमुख यांनी प्रत्येकी पाच लाखांचा दंड ठोठावल्याची माहिती सोमवारी दिली.       अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ हा जनहित व जनआरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा कायदा ५ ऑगस्ट २०११ पासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लागू झाला. सर्वसामान्य जनतेस सकस, निर्भेळ आणि सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे हाच या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. नवी मुंबईतील वाशी येथील घाऊक बाजारपेठेमध्ये कोल्हापूर आणि सांगलीच्या उत्पादकांनी गुळाची विक्री केली होती. याच गुळाची तपासणी कोकण विभागाच्या अन्न व औषध प्रशासनाने जानेवारी २०२१ मध्ये केली होती. सर्व तपासणीनंतर या गुळात कृत्रिम खाद्य रंगाची भेसळ केल्याचे विश्लेषणाअंती सिद्ध झाल्यामुळे कोल्हापूरच्या मेसर्स इ एच काथवाला आणि कंपनी सांगलीच्या  मेसर्स सत्यविजय सेल्स कापोर्रेशन या दोन गुळ उत्पादकांना प्रत्येकी पाच लाख रुपये इतका दंड ३० सप्टेंबर २०२२ रोजी ठोठावला आहे.

का होते कारवाई

आहारात साखरेचे प्रमाण कमी असावे याची सर्वसामान्यांना आता जाणीव होऊ लागल्याने साखरेला पर्याय अनेकजण गुळाची निवड करतात. सद्यस्थितीत बाजारात साखरेपेक्षा गुळाची किंमत तुलनेने अधिक आहे. ग्राहकांचा गुळाच्या खरेदीकडे असलेला कल व गुळाची साखरेपेक्षा जास्त असलेली किंमत या बाबी विचारात घेता गुळाचे उत्पादन करताना काही व्यापारी  त्यात साखरेचा वापर करणे, चॉकलेटचा वापर करणे आणि कृत्रिम रंगाचा वापर करणे यासारख्या गैरकायदेशीर  मार्गाचाही अवलंब करीत असल्याचे वारंवार स्पष्ट झाल्यानेच ही कारवाई केली जाते.   सहा महिन्यात १६० प्रकरणे निकाली अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी एप्रिल ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत १७० प्रकरणे दाखल झाली. त्यातील  १६० प्रकरणांचा अंतिम निकाल लागला.  त्यात ७० लाखापेक्षा जास्त दंड या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांना ठोठावला आहे. 

गुळाला मागणी वाढल्यामुळे त्यात चॉकलेट किंवा कृत्रिम रंग मिसळला जातो. याच रंगामुळे कर्करोगासारखाही धोका होण्याची भीती असते. त्यामुळेच भेसळ करणाºयांना जरब बसावी म्हणून मोठया दंडाची तरतूद आहे. त्यामुळे कोणत्याही अन्न पदार्थाचा दर्जा आणि गुणवत्ता याबाबत  शंका असल्यास त्याची तक्रार अन्न औषध प्रशासनाच्या १८०० - २२२ - ३६५ या टोल फ्री क्रमांकावर करावी.सुरेश देशमुख, सह आयुक्त (अन्न), कोकण विभाग, अन्न व औषध प्रशासन,ठाणे 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSangliसांगलीFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग