शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
3
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
4
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
5
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
6
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
7
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
8
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
9
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
10
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
11
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
12
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
13
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
14
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
15
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
16
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
17
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
18
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
19
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
20
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर-शहाड रस्ता सहा महिने अर्धवटच!

By admin | Updated: March 21, 2016 01:22 IST

शहाड ते पालिकादरम्यानच्या रस्त्याचे काम सहा महिन्यांपासून अर्धवट स्थितीत आहे. यासंदर्भात पालिका आयुक्तांनी संबंधित कंत्राटदाराला आठवडाभराचा अल्टीमेटम तसेच पालिका अधिकाऱ्यांवरही

उल्हासनगर : शहाड ते पालिकादरम्यानच्या रस्त्याचे काम सहा महिन्यांपासून अर्धवट स्थितीत आहे. यासंदर्भात पालिका आयुक्तांनी संबंधित कंत्राटदाराला आठवडाभराचा अल्टीमेटम तसेच पालिका अधिकाऱ्यांवरही कारवाईचा इशारा दिला आहे. दरम्यान, रस्त्याच्या अर्धवट कामामुळे मागील चार महिन्यांत सहा जणांचे बळी गेले आहेत.
या रस्त्याच्या कामासंदर्भात बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजय रिजवान, उपअभियंता जितू चोयथानी, संदीप जाधव यांच्यावर आयुक्तांनी ठपका ठेवला आहे. उल्हासनगर महापालिका ते शहाड रेल्वे स्थानकादरम्यानचा रस्ता भूमिपूजनापासूनच वादात सापडला आहे.
रस्त्याचे एकदा नव्हे तर दोनदा राजकीय श्रेय घेण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादीकडून भूमिपूजन झाले. मात्र, रस्त्याचे काम सहा महिन्यांपासून अर्धवटच आहे. यामुळे चार महिन्यांत सहा जणांचे बळी गेले, असा आरोप शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्रसिंग भुल्लर यांनी केला आहे.
मृत नातेवाइकांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत देण्याची मागणी महासभेने केली आहे. तसेच कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते मनोज लासी यांनी केली आहे.
या रस्त्यासाठी सरकारने १७ कोटी दिले आहेत. या प्रकरणी कंत्राटदारावर कारवाई करत काळ्या यादीत टाकण्याची मागणी सर्वपक्षीयांनी केली आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते नाना बागुल यांनी कंत्राटदारासह पालिकेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कंत्राटदाराच्या रकमेतून मृतांच्या नातेवाइकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. रस्त्याचे प्रकरण चिघळत असल्याचे लक्षात आल्यावर आयुक्त मनोहर हिरे यांनी हस्तक्षेप करत कंत्राटदाराला काम करण्याचा दम दिला आहे. (प्रतिनिधी)