शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

उल्हासनगर महापालिकेच्या निर्णयाने भूमाफियांचे दणाणले धाबे, महापालिकेच्या १ हजार ६४ मालमत्तांना मिळणार सनद?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 7:19 PM

Ulhasnagar Municipal Corporation News: महापालिका मालमत्तेचे अतिक्रमणा पासून सरंक्षण करण्यासाठी, १ हजार ६४ मलमत्तेला सनद मिळण्यासाठी मंगळवारी आयुक्तांसोबत उपविभागीय अधिकाऱ्याचे प्रतिनिधी, तहसिलदार व भूमापन अधिकारी यांच्यात संयुक्त बैठक झाली.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर - महापालिका मालमत्तेचे अतिक्रमणा पासून सरंक्षण करण्यासाठी, १ हजार ६४ मलमत्तेला सनद मिळण्यासाठी मंगळवारी आयुक्तांसोबत उपविभागीय अधिकाऱ्याचे प्रतिनिधी, तहसिलदार व भूमापन अधिकारी यांच्यात संयुक्त बैठक झाली. यामध्ये महापालिकेचे विविध कार्यालये, शाळा, मैदाने, उद्याने, समाजमंदिर, शौचालये आदी मालमत्तेचा समावेश आहे.

 उल्हासनगर महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ७० टक्के आरक्षित भूखंडावर यापुर्वीच अतिक्रमण झाले असून भूमाफियांनी आपला मोर्चा शाळा इमारत, उद्याने, शौचालये, खुल्या जागेवर वळविला. तसेच शहरातील जागेवर राज्य शासनाची मालकीहक्क असल्याने, विकासकामा वेळी महापालिकेला अडथळ्यांची शर्यत पूर्ण करावी लागत आहे. दरम्यान कबरस्थानचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर तत्कालीन महापौर पंचम कलानी यांनी आयडीआय कंपनी जवळील भूखंड हा कबरस्थानसाठी, गोलमैदान, महापालिका मुख्यालय, तरणतलाव, हिराघाट बोट क्लब, इंदिरा गांधी भाजी मार्केट, व्हिटीसी ग्राऊंड यांच्यासह उद्याने, मैदाने, शाळा, प्रभाग कार्यालये असे एकून १६५ मालमत्ताना सनद देण्याची मागणी उपविभागीय कार्यालय, राज्य शासनाकडे केली. आजपर्यंत फक्त ८ मालमत्ताना सनद म्हणजे मालकीहक्क मिळाली आहे.

 महापालिका उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी यापुढे एकपाऊल पुढे टाकून, आयुक्त डॉ राजा दयानिधी, महापौर लिलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी यांच्यासह प्रभाग व विशेष सभापती, विविध पक्षाचे गटनेते व नगरसेवकांना विश्वासात घेऊन महापालिका ताब्यातील तब्बल १ हजार ६४ मालमत्ताना सनद मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या मालमत्ताना सनद मिळाल्यास या मालमत्ता अतिक्रमण व भूमाफिया पासून वाचणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. यासाठी एका सल्लागार पथकाची नियुक्त केली असून सुरवातीला सल्लागार पथक तीन महिन्यात १६५ मालमत्ताचा आराखडा उपविभागीय कार्यलयाला सनद मिळण्यासाठी सादर करणार असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. 

महापालिका मालमत्तेचे होणार सरंक्षणमहापालिकेने मालमत्ता सरंक्षणासाठी सुरू केलेल्या कारवाईचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे. मालमत्ताना सनद मिळाल्यास त्यावरील अतिक्रमनाचा धोका टळणार असून विकासासाठीचे अडथळे दूर होणार आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे