शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरला दोन दिवस पाणी

By admin | Updated: March 11, 2016 02:35 IST

एमआयडीसीची पाणीकपात ६५ टक्क्यांवर गेल्याने दोन दिवस पाणीपुरवठा पूर्ण बंद आणि उरलेल्या चार दिवसांत विभागवार पाणीवाटपामुळे नागरिकांना अवघे दोन दिवस

उल्हासनगर : एमआयडीसीची पाणीकपात ६५ टक्क्यांवर गेल्याने दोन दिवस पाणीपुरवठा पूर्ण बंद आणि उरलेल्या चार दिवसांत विभागवार पाणीवाटपामुळे नागरिकांना अवघे दोन दिवस, तेही कमी दाबाने पाणी देण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी तयार केला आहे. या प्रस्तावाला अद्याप मान्यता मिळाली नसली, तरी एकंदर पाणीटंचाई पाहता याशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नसल्याचे आणि तीव्र टंचाईच्या भागात टँकर पाठवण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.
परिणामी, नागरिकांना पाण्यासाठी विहिरी, बोअरवेल, हातपंपांवर अवलंबून राहावे लागणार आहे. सध्या टंचाईमुळे शहराच्या पूर्व भागात गुरुवारी आणि शुक्रवारी, तर पश्चिमेत मंगळवारी, शुक्रवारी पाणीपुरवठा पूर्ण बंद राहणार आहे. त्यामुळे नगरसेवक आणि अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन चार दिवसांत पुरवून पाणी कसे वितरीत करायचे, याचा आराखडा तयार केल्याची माहिती आयुक्त मनोहर हिरे यांनी दिली.
कॅम्प-५ ला शनिवारी व सोमवारी, कॅम्प-४ ला रविवारी व मंगळवारी पाणीपुरवठा करण्याचा विचार सुरू आहे. अतिटंचाईग्रस्त भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. १मुंब्रा येथील पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा व्हावी, यासाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही तर शासकीय कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा राकाँपाच्या पदाधिकाऱ्यांनी महापे येथे दिला. मुंब्रा-कौसा भागातील नागरिकांना किमान दैनंदिन गरजा पूर्ण करण्याएवढा पाणीपुरवठा करावा. पाणीकपात चारऐवजी दोन दिवस करावी. २शुक्र वारी पाणीकपात करण्यात येऊ नये, या मागण्यांसाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राकाँपाने गुरु वारी एमआयडीसीच्या म्हापे येथील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढला होता. या वेळी कार्यकारी अभियंता प्रकाश चव्हाण यांनी वरील भागातील पाणीकपात चारऐवजी तीन दिवस करण्याचे तसेच दाब वाढविण्याचे आणि शुक्रवारी पाणीकपात रद्द करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.३दरम्यान, अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून पाणीपुरवठ्यात सुधारणा केली नाही. तर, पूर्वसूचना न देता एमआयडीसी आणि ठामपाच्या मुख्यालयासमोर ढोलताशे वाजवून कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा राकाँपाचे विभागीय अध्यक्ष शमीम खान यांनी दिला. या मोर्चामध्ये किमान वेतन सल्लागार आयोगाचे अध्यक्ष सय्यद अली अशरफ, मुंब्रा प्रभाग समितीचे अध्यक्ष अशरफ पठाण, येथील बहुतांशी नगरसेवक, नगरसेविका आणि हजारो नागरिक सहभागी झाले होते.