शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
4
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
5
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
6
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
7
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
8
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
9
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
10
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
11
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
12
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
13
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
14
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
15
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
16
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
17
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

लहान मुले, वयोवृद्ध यांना रेल्वेत प्रवेश द्या - रेल्वे प्रशासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 01:05 IST

उन्हाळी सुटीमध्ये गावी जाणाऱ्यांसोबत बॅगांची संख्या जास्त असल्याने अनेकदा सामानसुमान रेल्वेगाड्यात चढवण्याच्या नादात बऱ्याचदा लहान मुले आणि वयोवृद्धांकडे दुर्लक्ष होऊन ते मागे राहण्याचे प्रकार ठाणे स्थानकात घडत आहेत.

पंकज रोडेकरठाणे : उन्हाळी सुटीमध्ये गावी जाणाऱ्यांसोबत बॅगांची संख्या जास्त असल्याने अनेकदा सामानसुमान रेल्वेगाड्यात चढवण्याच्या नादात बऱ्याचदा लहान मुले आणि वयोवृद्धांकडे दुर्लक्ष होऊन ते मागे राहण्याचे प्रकार ठाणे स्थानकात घडत आहेत. त्यातून अपघात घडण्याची शक्यता असते. गाडीची चेन खेचल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. त्यामुळे अतिरिक्त सामान नेणाऱ्यांनी लहान मुले व वृद्धांना सर्वप्रथम रेल्वेत प्रवेश करू द्या, असे आवाहन रेल्वे पोलीस व अधिकाऱ्यांनी केले आहे.

सुटीत गावी जाण्यासाठी रेल्वेचे बुकिंग काही महिने अगोदर करण्यात येते. दीर्घकाळ प्रवासाला जाणारे आपल्यासोबत छोट्या-मोठ्या गरजेच्या वस्तू घेतात म्हणून बॅगांची संख्या वाढते. बाहेरगावच्या गाड्या फलाटावर जेमतेम चार ते पाच मिनिटे थांबतात. वजनदार बॅगा घेऊन डब्यात चढताना बायकांचा गोंधळ उडतो. मुलांचा हात सुटतो. गोंधळात कुणी खालीच राहिल्यास लक्षात येत नाही. बºयाचदा बॅगा चढवण्याच्या नादात लहान मुले-वयोवृद्धांना गर्दीत चढता येत नाही. ते फलाटावरच राहून जातात. असे प्रकार ठाणे रेल्वेस्थानकात पाहण्यास मिळत आहेत. फलाटावर राहिलेले वृद्ध रेल्वेस्टेशन मॅनेजरकडे येतात किंवा फलाटावर एकटी राहिलेली मुले रडतरडत स्टेशनवर आणली जातात. मुलगा किंवा वडील खाली राहिल्यामुळे पुढील कल्याण किंवा कर्जत-कसारा स्थानकांवर बॅगासह उतरून अन्य डब्यात चढलेल्यांना परत माघारी यावे लागते. बाहेरगावी जायच्या नियोजनावर पाणी सोडावे लागते. असा गोंधळ उडालेली मंडळी रेल्वे अधिकाऱ्यांवर राग काढतात. तिकिटांच्या पैशांची भरपाई देण्याची मागणी करतात. त्यामुळे अगोदर मुले व वृद्ध यांना रेल्वेगाडीत प्रवेश करू द्या, असे आवाहन केले आहे.

...आणि मुलगी फलाटावरपवन एक्स्प्रेस रविवारी दुपारी थोडीशी उशिरा आली. या गाडीने प्रवास करणाºया एक कुटुंबासोबत असलेली पाच वर्षांची मुलगी गडबडीत फलाटावरच राहिली. हे लक्षात येताच एकाने चेन खेचून गाडी थांबवली. त्यानंतर, त्या चिमुरडीला घेतल्यानंतर गाडी सोडण्यात आली. यामुळे रेल्वे कर्मचाºयांना मनस्ताप झाला.

आजी-नातू राहिले खालीचशनिवारी ठाण्यातून आजीआजोबा नातवाला घेऊन औरंगाबादला चालले होते. आजोबा गाडीत चढले, तोच गाडी सुटल्याने आजी आणि नातू खाली राहिले. हे लक्षात आल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्याने गार्डला इशारा करून गाडी थांबवली. त्यानुसार, गाडी थांबल्यावर आजी-नातू गाडीत चढले आणि गाडी सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :railwayरेल्वे