शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

लहान मुले, वयोवृद्ध यांना रेल्वेत प्रवेश द्या - रेल्वे प्रशासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 01:05 IST

उन्हाळी सुटीमध्ये गावी जाणाऱ्यांसोबत बॅगांची संख्या जास्त असल्याने अनेकदा सामानसुमान रेल्वेगाड्यात चढवण्याच्या नादात बऱ्याचदा लहान मुले आणि वयोवृद्धांकडे दुर्लक्ष होऊन ते मागे राहण्याचे प्रकार ठाणे स्थानकात घडत आहेत.

पंकज रोडेकरठाणे : उन्हाळी सुटीमध्ये गावी जाणाऱ्यांसोबत बॅगांची संख्या जास्त असल्याने अनेकदा सामानसुमान रेल्वेगाड्यात चढवण्याच्या नादात बऱ्याचदा लहान मुले आणि वयोवृद्धांकडे दुर्लक्ष होऊन ते मागे राहण्याचे प्रकार ठाणे स्थानकात घडत आहेत. त्यातून अपघात घडण्याची शक्यता असते. गाडीची चेन खेचल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. त्यामुळे अतिरिक्त सामान नेणाऱ्यांनी लहान मुले व वृद्धांना सर्वप्रथम रेल्वेत प्रवेश करू द्या, असे आवाहन रेल्वे पोलीस व अधिकाऱ्यांनी केले आहे.

सुटीत गावी जाण्यासाठी रेल्वेचे बुकिंग काही महिने अगोदर करण्यात येते. दीर्घकाळ प्रवासाला जाणारे आपल्यासोबत छोट्या-मोठ्या गरजेच्या वस्तू घेतात म्हणून बॅगांची संख्या वाढते. बाहेरगावच्या गाड्या फलाटावर जेमतेम चार ते पाच मिनिटे थांबतात. वजनदार बॅगा घेऊन डब्यात चढताना बायकांचा गोंधळ उडतो. मुलांचा हात सुटतो. गोंधळात कुणी खालीच राहिल्यास लक्षात येत नाही. बºयाचदा बॅगा चढवण्याच्या नादात लहान मुले-वयोवृद्धांना गर्दीत चढता येत नाही. ते फलाटावरच राहून जातात. असे प्रकार ठाणे रेल्वेस्थानकात पाहण्यास मिळत आहेत. फलाटावर राहिलेले वृद्ध रेल्वेस्टेशन मॅनेजरकडे येतात किंवा फलाटावर एकटी राहिलेली मुले रडतरडत स्टेशनवर आणली जातात. मुलगा किंवा वडील खाली राहिल्यामुळे पुढील कल्याण किंवा कर्जत-कसारा स्थानकांवर बॅगासह उतरून अन्य डब्यात चढलेल्यांना परत माघारी यावे लागते. बाहेरगावी जायच्या नियोजनावर पाणी सोडावे लागते. असा गोंधळ उडालेली मंडळी रेल्वे अधिकाऱ्यांवर राग काढतात. तिकिटांच्या पैशांची भरपाई देण्याची मागणी करतात. त्यामुळे अगोदर मुले व वृद्ध यांना रेल्वेगाडीत प्रवेश करू द्या, असे आवाहन केले आहे.

...आणि मुलगी फलाटावरपवन एक्स्प्रेस रविवारी दुपारी थोडीशी उशिरा आली. या गाडीने प्रवास करणाºया एक कुटुंबासोबत असलेली पाच वर्षांची मुलगी गडबडीत फलाटावरच राहिली. हे लक्षात येताच एकाने चेन खेचून गाडी थांबवली. त्यानंतर, त्या चिमुरडीला घेतल्यानंतर गाडी सोडण्यात आली. यामुळे रेल्वे कर्मचाºयांना मनस्ताप झाला.

आजी-नातू राहिले खालीचशनिवारी ठाण्यातून आजीआजोबा नातवाला घेऊन औरंगाबादला चालले होते. आजोबा गाडीत चढले, तोच गाडी सुटल्याने आजी आणि नातू खाली राहिले. हे लक्षात आल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्याने गार्डला इशारा करून गाडी थांबवली. त्यानुसार, गाडी थांबल्यावर आजी-नातू गाडीत चढले आणि गाडी सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :railwayरेल्वे