शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
3
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
4
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
5
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
6
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
7
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
8
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
9
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
10
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
11
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
12
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
13
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
14
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
15
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
16
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
17
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
18
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
19
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
20
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आणखी दोन महिने पाणीबाणी, पाणी कपातीचे प्रमाण आहे तेवढेच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 01:39 IST

आॅक्टोबरपासून पाणी कपात सक्तीने लागू केल्यामुळे धरण साठ्यात अपेक्षेपेक्षा जास्त पाणी साठा आहे. त्यामुळे कपात कमी करण्याचे धोरण अवलंबण्याची शक्यता होती; मात्र यंदाच्या पावसाला विलंब होण्याची दाट शक्यता आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : आॅक्टोबरपासून पाणी कपात सक्तीने लागू केल्यामुळे धरण साठ्यात अपेक्षेपेक्षा जास्त पाणी साठा आहे. त्यामुळे कपात कमी करण्याचे धोरण अवलंबण्याची शक्यता होती; मात्र यंदाच्या पावसाला विलंब होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पाणी कपातीचे प्रमाण न वाढवता आहे तेवढेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; मात्र पाणी कपात वाढणार नसली, तरी ती लवकर बंदही होणार नाही. सुरळीत पाणी पुरवठा साधारणत: १५ जुलैपर्यंत केला जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.सध्या जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि एमआयडीसी परिसरात आठवड्यातून तीस तास पाणी कपात लागू आहे. या पाणी कपातीचे धोरण सक्तीने राबवले जात आहे. या २२ टक्के पाणी कपातीमुळे बारवी व आंध्र धरणातील पाणी उपसा कमी झाला आहे. त्यामुळे धरणांमध्ये बऱ्यापैकी पाणी साठा शिल्लक आहे. त्याचा सुयोग्य वापर करण्यासाठी पाणी कपात कमी करण्याचे नियोजन होणार होते; मात्र निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत लागू केलेली पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेणे शक्य झाले नाही. याशिवाय आताचा हवामानाचा अंदाज घेता यंदाचा पाऊस लांबणीवर पडण्याची दाट शक्यता वर्तविली आहे. त्यावर मात करण्यासाठी आहे तीच कपात पुढेही सुरू ठेवण्याचे धोरण आवलंबण्यात येत असल्याचे पाटबंधारे विभागाकडून स्पष्ट केले जात आहे.बारवी धरण व आंध्र धरणातील पाणी उल्हास नदीत सोडून त्यावर जिल्ह्यातील बहुतांश महापालिकांची तहान भागवली जात आहे. एमआयडीसी, स्टेम प्राधिकरण आणि महाराष्टÑ जीवन प्राधिकरण यांच्याव्दारे या पाण्याचा पुरवठा ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी आणि मीरा भार्इंदर महानगरपालिकांसह अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकांना होत आहे. या महापालिका व नगरपालिकांना त्यांच्या मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी पुरवठा केल्यामुळे बारवी धरणाच्या साठ्यात २२ टक्के पाण्याची तूट आॅक्टोबरमध्ये उघड झाली. त्यामुळे ३० तासाची पाणी कपात सक्तीने लागू केली आणि ती पूर्ण करण्यासाठी ठिकठिकाणच्या नागरिकांना वेगवेगळ्या दिवशी कपातीला तोंड द्यावे लागत आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात या कपातीत वाढ होण्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. पण तसे न होता आहे तीच कपात ठेवण्याचे धोरण स्विकारले जाणार आहे.सक्तीमुळे झाला मुबलक साठा, चोरी थांबलीसक्तीच्या पाणी कपातीसह पाणी चोरी बंद करण्यासाठी सक्तीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या. त्यामुळे मंजूर पाणी कोट्यातून आठवडाभर सुमारे २६२.२४ एमएलडी पाण्याची बचत करणे शक्य झाले. एवढेच नव्हे, तर रोज होणारी ३०० एमएलडीपेक्षा जास्त पाण्याची चोरीदेखील थांबवणे शक्य झाले.एमआयडीसीने ५८३ एमएलडी या मंजूर पाणी पुरवठ्यापेक्षा ७५० ते ८०० एमएलडी, तर केडीएमसीने २३४ मंजूर कोट्यापेक्षा सुमारे ३०० एमएलडी जास्त पाणी उचलल्याची नोंद आहे. या खालोखाल एमजेपीने ९०एमएलडीपेक्षा जास्त व टेमघरने २८५ या मंजूर कोट्यापेक्षा जादा पाणी उचलल्यामुळे यंदा पावसाळा संपताच पाणी कपातीला तोंड द्यावे लागले.या सक्तीच्या उपाययोजनेमुळे मंजूर पाणी कोट्यापेक्षा एमआयडीसीच्या सुमारे २०० एमएलडी व कल्याण डोेंबिवली महापालिका (केडीएमसी) सुमारे ६६ एमएलडी जादा पाणी उचलण्यास काही अंशी आळा घालणे शक्य झाली आहे.

बारवीची पातळी ५७.७० मीटरबारवी धरणाच्या ६८.६० मीटर पातळीपैकी आज रोजी या धरणाची पातळी ५७.७० मीटर एवढी आहे. सध्या ३२.२४ टक्के पाणी साठा आहे.गेल्या वर्षी याच दिवशी तो ४३.५२ टक्के होता. त्यानुसार धरणातील मुबलक पाणी साठा लक्षात घेऊन पाणी कपात कमी करण्याचे नियोजन होते.परंतु पावसाळा लांबण्याचा अंदाज लक्षात घेऊन पाणी कपात आहे तशीच ठेवण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिकांनी नियमानुसार सुमारे एक हजार १९२ दश लक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलणे अपेक्षित होते.प्रत्यक्षात एक हजार ५२१ एमएलडी पाणी उचलण्यात आले. सुमारे ३२९ एमएलडी जादा पाण्याची चोरी रोज करण्यात आली होती. यामुळे बारवी धरणाच्या पाणी साठ्यात २२ टक्के तूट उघड झाली. ती भरून काढण्यासाठी आॅक्टोबरपासून ही कपात लागू झाली होती.

टॅग्स :Waterपाणीthaneठाणे