शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

१८ गावांच्या प्रकरणावर सुनावणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:14 IST

कल्याण : केडीएमसीतून वगळलेल्या १८ गावांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. मागच्या सुनावणीवेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले ...

कल्याण : केडीएमसीतून वगळलेल्या १८ गावांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. मागच्या सुनावणीवेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले होते. मात्र, काही याचिकाकर्त्यांना नोटिसा न मिळाल्याने शुक्रवारी सुनावणी होऊ शकलेली नाही. याप्रकरणी दोन दिवसांत सुनावणीची पुढील तारीख मिळू शकते, असे सांगण्यात आले.

केडीएमसीतील २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका तयार करण्याची मागणी पाच वर्षांपासून प्रलंबित आहे. राज्य सरकारने २७ पैकी १८ गावे वगळण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याला याचिकाकर्ते संदीप पाटील, मोरेश्वर भोईर, संतोष डावखर, सुनिता खंडागळे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. १८ गावे मनपातून वगळू नयेत, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने सरकारने १८ गावे वगळण्याची काढलेली अधिसूचना व गावे वगळण्याची सुरू केलेली प्रक्रिया रद्दबातल ठरविली. या निर्णयासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात स्थगितीसाठी अर्ज दाखल केला जाऊ शकतो, अशी शक्यता गृहीत धरून पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी कॅव्हेट दाखल केले होते. याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय स्थगिती देऊ नये, अशी मागणी केली होती. दरम्यान, सरकार व केडीएसमीने सर्वोच्च न्यायालयात याचिका अर्ज दाखल करून उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयास स्थगिती द्यावी, अशी मागणी केली.

दरम्यान, १८ गावे मनपातून वगळावीत, अशी याचिका शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी, निलेश शिंदे, उल्हास जामदार आणि सुलेख डोन यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. या गावांमध्ये मनपाने विकासकामांवर केलेल्या खर्चाची रक्कम मनपास द्यावी, अशी त्यांची मागणी होती. या दोन्ही याचिकाकर्त्यांना नोटीस बजावून त्यांचे म्हणणे एकून घेतले जाईल. मात्र, याचिकाकर्त्यांना नोटीस बजावण्याचे काम २४ फेब्रुवारीपासून सुरू केले गेल्याने काहींना ही नोटीस बजावलेली नाही. त्यामुळे शुक्रवारी सुनावणी होऊ शकली नाही.

सुनावणीकडे सर्वांचे लक्ष

कोरोना आणि १८ गावांच्या न्यायप्रविष्ट प्रकरणांमुळे केडीएसमीची निवडणूक जाहीर होऊ शकलेली नाही. त्यामुळे सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींचे शुक्रवारच्या सुनावणीकडे लक्ष लागले होते. न्यायालयात १८ गावांप्रकरणी निकाल लागल्यास निवडणुकीचा मार्ग मोकळा होऊ शकतो, अशी अपेक्षा निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्यांकडून व्यक्त केली जात आहे.

-----------------