शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
6
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
7
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
8
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
9
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
10
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
11
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
12
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
13
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
14
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
15
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
18
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
19
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
20
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार

१८ गावांच्या प्रकरणावर सुनावणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:14 IST

कल्याण : केडीएमसीतून वगळलेल्या १८ गावांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. मागच्या सुनावणीवेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले ...

कल्याण : केडीएमसीतून वगळलेल्या १८ गावांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. मागच्या सुनावणीवेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले होते. मात्र, काही याचिकाकर्त्यांना नोटिसा न मिळाल्याने शुक्रवारी सुनावणी होऊ शकलेली नाही. याप्रकरणी दोन दिवसांत सुनावणीची पुढील तारीख मिळू शकते, असे सांगण्यात आले.

केडीएमसीतील २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका तयार करण्याची मागणी पाच वर्षांपासून प्रलंबित आहे. राज्य सरकारने २७ पैकी १८ गावे वगळण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याला याचिकाकर्ते संदीप पाटील, मोरेश्वर भोईर, संतोष डावखर, सुनिता खंडागळे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. १८ गावे मनपातून वगळू नयेत, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने सरकारने १८ गावे वगळण्याची काढलेली अधिसूचना व गावे वगळण्याची सुरू केलेली प्रक्रिया रद्दबातल ठरविली. या निर्णयासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात स्थगितीसाठी अर्ज दाखल केला जाऊ शकतो, अशी शक्यता गृहीत धरून पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी कॅव्हेट दाखल केले होते. याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय स्थगिती देऊ नये, अशी मागणी केली होती. दरम्यान, सरकार व केडीएसमीने सर्वोच्च न्यायालयात याचिका अर्ज दाखल करून उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयास स्थगिती द्यावी, अशी मागणी केली.

दरम्यान, १८ गावे मनपातून वगळावीत, अशी याचिका शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी, निलेश शिंदे, उल्हास जामदार आणि सुलेख डोन यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. या गावांमध्ये मनपाने विकासकामांवर केलेल्या खर्चाची रक्कम मनपास द्यावी, अशी त्यांची मागणी होती. या दोन्ही याचिकाकर्त्यांना नोटीस बजावून त्यांचे म्हणणे एकून घेतले जाईल. मात्र, याचिकाकर्त्यांना नोटीस बजावण्याचे काम २४ फेब्रुवारीपासून सुरू केले गेल्याने काहींना ही नोटीस बजावलेली नाही. त्यामुळे शुक्रवारी सुनावणी होऊ शकली नाही.

सुनावणीकडे सर्वांचे लक्ष

कोरोना आणि १८ गावांच्या न्यायप्रविष्ट प्रकरणांमुळे केडीएसमीची निवडणूक जाहीर होऊ शकलेली नाही. त्यामुळे सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींचे शुक्रवारच्या सुनावणीकडे लक्ष लागले होते. न्यायालयात १८ गावांप्रकरणी निकाल लागल्यास निवडणुकीचा मार्ग मोकळा होऊ शकतो, अशी अपेक्षा निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्यांकडून व्यक्त केली जात आहे.

-----------------