शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

१८ गावांच्या प्रकरणावर सुनावणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:14 IST

कल्याण : केडीएमसीतून वगळलेल्या १८ गावांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. मागच्या सुनावणीवेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले ...

कल्याण : केडीएमसीतून वगळलेल्या १८ गावांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. मागच्या सुनावणीवेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले होते. मात्र, काही याचिकाकर्त्यांना नोटिसा न मिळाल्याने शुक्रवारी सुनावणी होऊ शकलेली नाही. याप्रकरणी दोन दिवसांत सुनावणीची पुढील तारीख मिळू शकते, असे सांगण्यात आले.

केडीएमसीतील २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका तयार करण्याची मागणी पाच वर्षांपासून प्रलंबित आहे. राज्य सरकारने २७ पैकी १८ गावे वगळण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याला याचिकाकर्ते संदीप पाटील, मोरेश्वर भोईर, संतोष डावखर, सुनिता खंडागळे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. १८ गावे मनपातून वगळू नयेत, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने सरकारने १८ गावे वगळण्याची काढलेली अधिसूचना व गावे वगळण्याची सुरू केलेली प्रक्रिया रद्दबातल ठरविली. या निर्णयासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात स्थगितीसाठी अर्ज दाखल केला जाऊ शकतो, अशी शक्यता गृहीत धरून पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी कॅव्हेट दाखल केले होते. याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय स्थगिती देऊ नये, अशी मागणी केली होती. दरम्यान, सरकार व केडीएसमीने सर्वोच्च न्यायालयात याचिका अर्ज दाखल करून उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयास स्थगिती द्यावी, अशी मागणी केली.

दरम्यान, १८ गावे मनपातून वगळावीत, अशी याचिका शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी, निलेश शिंदे, उल्हास जामदार आणि सुलेख डोन यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. या गावांमध्ये मनपाने विकासकामांवर केलेल्या खर्चाची रक्कम मनपास द्यावी, अशी त्यांची मागणी होती. या दोन्ही याचिकाकर्त्यांना नोटीस बजावून त्यांचे म्हणणे एकून घेतले जाईल. मात्र, याचिकाकर्त्यांना नोटीस बजावण्याचे काम २४ फेब्रुवारीपासून सुरू केले गेल्याने काहींना ही नोटीस बजावलेली नाही. त्यामुळे शुक्रवारी सुनावणी होऊ शकली नाही.

सुनावणीकडे सर्वांचे लक्ष

कोरोना आणि १८ गावांच्या न्यायप्रविष्ट प्रकरणांमुळे केडीएसमीची निवडणूक जाहीर होऊ शकलेली नाही. त्यामुळे सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींचे शुक्रवारच्या सुनावणीकडे लक्ष लागले होते. न्यायालयात १८ गावांप्रकरणी निकाल लागल्यास निवडणुकीचा मार्ग मोकळा होऊ शकतो, अशी अपेक्षा निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्यांकडून व्यक्त केली जात आहे.

-----------------