शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

...मग गुजरात आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीही बदलणार का?; शिवसेनेचा आशिष शेलारांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 22:20 IST

आशिष शेलार यांनी घरात बसलेल्या आपल्या आमदारांऐवजी या नगरसेवकांकडून माहिती घेतली असती तर असे अकलेचे तारे तोडले नसते, अशा शब्दांत महापौर नरेश म्हस्के यांनी शेलार यांच्या टिकेचा खरपूस समाचार घेतला.

ठाणे :  ठाण्यात करोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे ठाण्याचे पालकमंत्री बदला, असे अकलेचे तारे तोडणारे भाजपचे नेते आशिष शेलार गुजरातचा मृत्यूदर देशात सर्वाधिक असल्यामुळे आणि उत्तर प्रदेशात आकड्यांची लपवाछपवी सुरू असल्यामुळे या दोन राज्यांचे मुख्यमंत्री बदलण्याची मागणी पंतप्रधानांकडे करणार का, असा सणसणीत टोला ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सोमवारी लगावला.ठाण्यातील मृत्यूदर आज ३ टक्क्यापर्यंत रोखण्यात यश आले आहे. याउलट भाजपची सत्ता असलेल्या पुणे शहरात हा दर ४.२ टक्के आहे, तर गुजरातमध्ये हाच दर तब्बल ६.७ टक्के आहे. भाजप सातत्याने मिरवते ते गुजरात मॉडेल हेच आहे का, असा बोचरा सवालही म्हस्के यांनी केला.

गुजरात सरकार करोनाच्या चाचण्या करत नाही. सरकारची परवानगी असल्याशिवाय चाचण्या करायच्या नाहीत, असा आदेशच सरकारने काढला आहे. या परवानग्या येण्यासाठी ३ ते ७ दिवस लागतात. शेवटी तेथील हायकोर्टालाही याची दखल घ्यावी लागली. उत्तर प्रदेशची संख्या महाराष्ट्राच्या दुप्पट असूनही तपासणीचा दर महाराष्ट्रापेक्षाही कमी आहे. गुजरात, उत्तर प्रदेशमध्ये आकड्यांची लपवाछपवी सुरू असल्याची टीका वैद्यकीय क्षेत्रातली मंडळीच करत आहेत. उत्तर प्रदेशात तर अधिक तपासण्यांची मागणी करणाऱ्या काही जिल्हाधिकाऱ्यांची राज्याच्या मुख्य सचिवांनी खरडपट्टी काढल्याचे वृत्त असून त्याबाबत टिका करणाऱ्या राज्याच्या निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याच्या मागे तेथील सरकारने चौकशीचा ससेमिरा लावला आहे. त्यामुळे शेलारांनी त्यांच्या पक्षाचे नेते काय दिवे लावत आहेत, याकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही म्हस्के यांनी दिला.

ठाण्यात करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यात आले आहे. दिवसाला ७०० ते ८०० तपासण्या केल्या जातात. ठाण्यात आजमितीस करोनावरील उपचारासाठी एकूण २९९५ बेड्स उपलब्ध असून त्यापैकी ५५६ बेड्सना ऑक्सिजन पुरवठ्याची सोय आहे, तर आयसीयू बेड्स २१८ आणि ७६ व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक हजार खाटांचे अद्ययावत रुग्णालय उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मुंब्रा येथे देखील क्रीडा संकुलात एक हजार खाटांचे रुग्णालय उभे करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तब्बल ५२ क्वारंटाइन सेंटर्स सुरू करण्यात आली असून तिथे १६६३५ खाटांची क्षमता उपलब्ध आहे. झोपडपट्ट्या आणि दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये घरोघरी जाऊन स्क्रीनिंग करण्यात येत असून संशयितांना तातडीने क्वारंटाइन केले जात आहे. ८३ रुग्णवाहिका सेवेत असून स्वत: पालकमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने ठाणे, नवी मुंबई, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण असे ठिकठिकाणी भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेत आहेत. करोनाबाधित रुग्णांची विचारपूस करण्यासाठी स्वत: पीपीई किट घालून ते सिव्हिल रुग्णालयातील करोना वॉर्डातही गेल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे.

यानंतर भाजपच्या ठाण्यातल्या नगरसेवकांनीच मला फोन करून पालकमंत्र्यांना काळजी घ्यायला सांगा, अशा शब्दांत चिंता व्यक्त केली होती. आशिष शेलार यांनी घरात बसलेल्या आपल्या आमदारांऐवजी या नगरसेवकांकडून माहिती घेतली असती तर असे अकलेचे तारे तोडले नसते, अशा शब्दांत म्हस्के यांनी शेलार यांच्या टिकेचा खरपूस समाचार घेतला.

भाजपचे नेते डरपोकपालकमंत्री स्वत:च्या जिवाची पर्वा न करता पीपीई किट घालून करोना वॉर्डात गेल्याचे चित्र उभ्या महाराष्ट्राने पाहिले. पण शेलार पत्रकार परिषदेसाठीही मुंबईतून ठाण्यात यायला तयार नाहीत. ऑनलाइन पत्रकार परिषद घेऊन अकलेचे तारे तोडण्यात ते धन्यता मानत आहेत, अशी टीकाही म्हस्के यांनी केली. राज्य सरकार करोनाचा मुकाबला सर्व शक्तिनिशी करत आहे. सरकारचे मंत्री स्वत:ची पर्वा न करता लोकांमध्ये जाऊन काम करत असल्यामुळेच काही मंत्र्यांनाही करोनाची बाधा झाली. भाजपचे नेते मात्र लोकांमध्ये मिसळण्यास घाबरत असून केवळ राजभवनच्या वाऱ्या करण्यात धन्यता मानत असल्याचा टोलाही त्यांनी हाणला.

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारShiv SenaशिवसेनाThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाEknath Shindeएकनाथ शिंदेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस