शहरं
Join us  
Trending Stories
1
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
2
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
5
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
6
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
7
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
8
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
9
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
10
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
11
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
12
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
13
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
14
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
15
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
16
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
17
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
18
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
19
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
Daily Top 2Weekly Top 5

..तर आम्हालाही आत्महत्या करण्याची वेळ येईल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:37 IST

प्रशांत माने लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लागण्याचे संकेत ...

प्रशांत माने

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लागण्याचे संकेत मिळत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत व्यापारी आणि त्यावर अवलंबून असलेला नोकरदार वर्ग आधीच हवालदिल झाला आहे. त्यामुळे दुसऱ्या लॉकडाऊनचे उभे राहिलेले संकट पाहता त्यांच्यापुढची चिंता अधिकच वाढली आहे. व्यापारी कमावतील तेव्हाच ते आम्हाला वेतन देऊ शकतील ना. त्यांचाच व्यवसाय बंद राहिला तर ते आम्हाला कसे वेतन देऊ शकतील. आधीच व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असताना दुसरा लॉकडाऊन लागला तर वेतनाअभावी उपासमारीला सामोरे जावे लागेल. परिणामी, शेतकऱ्यांप्रमाणे आम्हालाही आत्महत्या करावी लागेल, अशी भीती नोकरदार वर्ग व्यक्त करत आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोणतीही आगाऊ पूर्वसूचना न देता लॉकडाऊन जाहीर झाल्याने परराज्यात राहणाऱ्या नोकरदारांचे स्थानिक पातळीवर माेठे हाल झाले. लॉकडाऊनमुळे रेल्वे वाहतूकही बंद झाल्याने पायपीट करत मजुरांना गावे गाठावी लागली. २२ मार्च ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चाललेला लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. ज्यांची दुकाने भाड्याने चालत होती त्यांचे भाडे थकले. हप्ते वाढल्याने व्यवसाय बंद करावे लागले. तर दुसरीकडे ज्यांच्या मालकीची दुकाने होती, त्यांना मालमत्ता कर आणि विजेची बिले भरताना नाकीनव आले. लॉकडाऊननंतरच्या अनलॉकमध्येही चालू झालेल्या व्यवसायांना नियमांचे बंधन कायम राहिल्याने सणासुदीत व्यवसायांवर परिणाम झाला. वर्षभर ही कसरत चालू असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिवसागणिक रुग्णांचे वाढते प्रमाण देशासाठी चिंतेची बाब ठरली आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. त्यामुळे आठ ते पंधरा दिवसांचा कडक लॉकडाऊन लागण्याची दाट शक्यता आहे. एकीकडे वीकेंड लॉकडाऊन लागू केला असताना आठवडाभर अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. डोंबिवलीतील काही व्यापाऱ्यांनी या निर्णयाविरोधात घरातच उपोषणाचा मार्ग अवलंबून निषेध नोंदवला आहे. या एकूणच परिस्थितीमुळे व्यापारी हतबल झाले आहेत, तर नोकरदार लॉकडाऊनच्या भीतीने गावाकडे निघू लागला आहे.

नाेकरदार पुन्हा देशाेधडीला

काही व्यापाऱ्यांनी नोकरदारांना वाऱ्यावर साेडलेले नाही. व्यवसाय बंद असला तरी त्यांना वेतन देण्यात येत आहे, तर काही ठिकाणी भाडे परवडत नसल्याने व्यवसाय बंद झाले आहेत. त्यामुळे येथील नोकरदार देशोधडीला लागल्याचे चित्र आहे. वर्षभर तारेवरची कसरत सुरू असताना एकामागोमाग येत असलेल्या कोरोनाच्या लाटांमध्ये जीवन जगायचे तरी कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. राज्य सरकारनेच यामध्ये तोडगा काढून दिलासा द्यावा, याकडे लक्ष वेधले जात आहे.